HW News Marathi
मुंबई

मरोळमध्ये माकडांचा उच्छाद, नव्या पाहुण्यांमुळे रहिवाशी झाले त्रस्त

मुंबई | अंधेरी पूर्व मरोळ येथील चर्च रोडवर असलेल्या ईको एलिगन्स सोसायटीतील राहिवाशी सध्या माकडाच्या उच्छादामुळे प्रचंड त्रस्त आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसात या सोसायटीमध्ये दोन- तीन माकडांचे वास्तव्य आहे. भूक लागल्यानंतर हि माकडे कोणत्याही घराच्या खिडकीतून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात.

गेल्या काही दिवसांपासून या ईमारतीत वास्तव्याला असलेली ही दोन ते तीन माकडे दिवसाच नाही तर रात्री देखील सोसायटी सोडायला मागत नाही. भूक लागली की कुणाच्याही घरी घुसून खायचे आणि खाऊन झाले की सोसायटीत मीळेल त्याच्या घरी, कोणाच्या बालकनीत आराम करायचा असा यांचा दिनक्रम ठरलेला आहे. माकड घरात कोणी आहे नाही याची कसलीही तसदी घेत नाहीत, घराची खीडकी उघडी मिळाली की घरात घुसून सर्व सामान अत्यव्यस्त करतात.

मागील कित्येक दिवसांपासून हा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशानी अग्निशमन दलाला याची तक्रार देखील केली असता, माकडांना आम्ही पकडू शकत नाही, असे उत्तर राहिवाशांना मिळाले. अखेर याची तक्रार वन विभागात केली असता आमच्याकडे दोनच पिंजरे असून स्टाफ नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मागील कित्येक वर्षांपासून राहिवाशी या ईमारतीत राहतात मात्र अशी माकडे येऊन रहाणे सगळ्यांसाठीच नवीन आहे.

राहिवाशांनी या माकडांचा एवढा धसका घेतलाय की लहान मुलांनी खाली खेळणे बंद केले आहे. तर घराच्या खिडक्या उघडताना देखील रहीवाशांना भीती वाटते. अग्निशमन विभाग आणि वन खात्याने लवकरात यात लक्ष घालण्याची मागणी राहिवाशांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

म्हाडाच्या घरांची १६ डिसेंबरला लॉटरी सोडत

swarit

मध्य रेल्वेतील अंबरनाथ-बदलापूर स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे

News Desk

दादरमध्ये दिवसाढवळ्या हत्या

News Desk
राजकारण

मी आता निवडणुक लढणार नाही। चंद्रकांत पाटील

News Desk

कोल्हापूर । काही महिन्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहे. सर्व पक्षातील नेते मंडळी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे यापुढे कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. पाटील यांनी कोल्हापुरातील गणराया पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

नेमके काय म्हटले चंद्रकांत पाटील

या कार्यक्रमात पाटील म्हटले की, ‘मला ना लोकसभा, ना विधानसभा, ना पदविधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची, मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही.’

चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्री आणि मदत व पुनर्वसन ममत्री अशी तीन महत्त्वाची खाती सांभाळत आहेत.

चंद्रकांत पाटील यांचा अल्प परिचय

चंद्रकांत पाटील यांच्या आयुष्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी संघटनेत असलेल्या अभाविच्या माध्यमातून झाली. तर २००४ मध्ये पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन राजकारणात सक्रीय झाले.

तसेच २०१३ मध्ये चंद्रकात पाटील यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली. तर २०१४ मध्ये ते विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले. यानंतर भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. सध्या पाटील यांच्याकडे राज्याची तीन महत्त्वपुर्ण खाती सांभाळत आहेत.

Related posts

अजित पवार आणि पार्थ पवारांसंबंधी बारामतीतून आली मोठी बातमी

swarit

राहुल गांधी आज घेणार काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक

News Desk

आमच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाही !

News Desk