HW News Marathi
मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 28वा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

वाहतूक नियंत्रणातील आयटीचा वापर, विविध उपक्रम प्रशंसनीय
महाराष्ट्र पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस, बृहन्मुंबई महापालिका आणि परिवहन आयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 28 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा सोमवारी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुंबई शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस शाखेमार्फत करण्यात येत असलेला आयटी तंत्रज्ञानाचा वापर व यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम प्रशंसनीय आहेत, असे अमिताभ बच्चन म्हणाले
एनसीपीए सभागृहात आयोजित या कार्यक्रमास गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, अपर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन, परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त अनुपकुमार, देवेन भारती आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बच्चन यांच्या हस्ते हायड्रॉलिक क्रेनला झेंडी दाखवून या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. 9 ते 15 जानेवारी दरम्यान हा सप्ताह चालणार असून या काळात विविध उपक्रमांद्वारे रस्ते सुरक्षीततेविषयी जनजागृती केली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सादरीकरण करताना मुंबई वाहतूक पोलीसांच्या MTP (Mumbai Traffic Police) या अॅपविषयी सहपोलीस आयुक्त भारंबे यांनी माहिती दिली होती. कार्यक्रम सुरु असतानाच आपण आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्याचे बच्चन यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस शाखेमार्फत करण्यात येत असलेला आयटी तंत्रज्ञानाचा वापर व यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम प्रशंसनीय आहेत. आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा तेथील वाहतुकीची शिस्त पाहून आपण अचंबित होतो. आपल्या देशातही अशीच शिस्त आवश्यक असून जेव्हा परदेशातील लोक इथे येतील तेव्हा इथली वाहतुकीची शिस्त पाहून त्यांनी अचंबित व्हायला हवे. मुंबई वाहतूक पोलीसांमार्फत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम पाहून तो दिवस फार दूर नाही असा विश्वास वाटतो, असे त्यांनी सांगितले. शिस्तबद्ध वाहतुकविषयक जनजागृतीसाठी आपण संपूर्ण योगदान देण्यास तयार असून वाहतूक शाखेने यासाठी विविध जाहीराती, लघुफिल्म्स तयार कराव्यात, आपण त्यास सहभाग देऊ, असे बच्चन यांनी यावेळी सांगितले. आपला भारत देश अधिकाधिक स्वच्छ, निर्मल आणि शिस्तबद्ध वाहतुकविषयक संवेदनशील बनविण्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले

News Desk

लागला एकदाचा टीवाय बीकॉमचा ‘निक्काल’!

News Desk

काँग्रेसचा माजी आमदार भाजपाच्या गळाला

News Desk