HW News Marathi
मुंबई

पुण्यात २१ कुत्र्यांचे हत्याकांड

पुणे- विचित्र वागण्याची पुणेकरांची ख्याती आहे. यावेळी मात्र त्यांनी नीचपणाचा कळस गाठला आहे. भटक्या कुत्र्यांना चक्क जीवंत जाळून टाकण्यात आले आहे, तर १६ कुत्र्यांवर विषप्रयोग करून ठार करण्यात आले आहे. या प्रकारामुळे प्राणी प्रेमींना पुणेकरांबाबत नाराजी व्यक्त करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पॅनकार्ड रोडवरील बानेर वस्तीमध्ये हा प्रकार घडला आहे.

एनजीओच्या सदस्यांना बानेर जवळच्या झुडपांमध्ये कुत्र्यांचे सापळेही सापडले. त्यामुळे यापूवीर्ही या परिसरात मोठया प्रमाणावर भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात आले आहे. एएसीटी इंडियाच्या सदस्यांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 28 सप्टेंबरला पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कुत्र्यांचे शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर बुधवारी एफआयआर दाखल करण्यात येईल. एएसीटी इंडियाच्या सदस्यांनी कुत्र्यांबरोबर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल परिसरातील नागरीकांशी चर्चा केली. त्यावेळी तिथल्या लोकांनी घटनास्थळाजवळ असलेल्या आॅफीसकडे बोट दाखवले. त्या आॅफीसशी संबंधित असलेल्या काहीजणांनी चार कुत्र्यांना रशीने बांधले. त्यांना 50 मीटरपर्यंत फरफटत नेले तिथे त्या कुत्र्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. कुत्र्यांचे मृतदेह जळून राख झाले होते. फक्त हाड आणि कवटीकडचा भाग सापडला. हेच अवयव शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जेव्हा या कुत्र्यांना खेचून आणले तेव्हा ते मृतावस्थेत होते की, बेशुद्धावस्थेत त्याची खात्री नसल्याचे काही जणांनी सांगितले. या परिसरात आतापर्यंत २१ कुत्र्यांचे मृतदेह सापडले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न

News Desk

नेदरलँडची राणी मॅक्झीमा डबेवाल्यांच्या भेटीला

News Desk

मरोळमध्ये माकडांचा उच्छाद, नव्या पाहुण्यांमुळे रहिवाशी झाले त्रस्त

News Desk
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

सर्वोच्च न्यायालयने कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली

News Desk

केंद्र सरकारने जाचक रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल तरी बंद करावेत !-  नाना पटोले

News Desk

वाशिम जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसल्यास बॅड मार्निंग होईल  

News Desk