HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या महापौरांचे स्थलांतर आता राणीच्या बागेत

मुंबई | मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे आता भायखळ्यातील राणीबाग परिसरातील सरकारी बंगल्यात स्थलांतरित झाले आहेत. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवाजी पार्कमधील महापौर निवासाचा ताबा सोडला आहे. त्यामुळे आता लवकरच येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. काल (बुधवार) महापौर बंगल्यात एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महानगपालिका आयुक्त अजोय मेहता आणि शिवसेनेचे अन्य काही नेते उपस्थित होते.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात होणार असल्याची माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची तोडफोड किंवा येथील वृक्षतोड देखील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईतील महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी अपुरी पडते असल्यामुळे हे स्मारकासाठी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढीत घट

swarit

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्माराकावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची कोल्हेकुई सुरु

News Desk

दूरदर्शन केंद्राच्या दुसऱ्या मजल्याला आग,अर्ध्या तासातच आग नियंत्रणात

News Desk