HW News Marathi
मुंबई

मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली,जेष्ठ नागरिकांना लिफ्टमधून काढले बाहेर ,विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया

मुंबई | मंत्रालयातील लिफ्टमध्ये बसून सहाव्या मजल्यावर जाणाऱ्या काही ज्य़ेष्ठ नागरिकांना मंत्री शिवतारे यांनी लिफ्टमधून बाहेर काढून घुसखोरी केल्याचा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. त्यांना सर्वसामान्यांशी काही देणे-घेणे नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. गेल्याच आठवड्यात सरकारी अनास्थेमुळे एका ज्येष्ठाने सहाव्या मजल्यावर विषय प्राशन करून जीवनयात्रा संपवली. यातून सरकारचे मंत्री धडे घेतील, असे वाटत होते. परंतु त्यांना कशानेच काही फरक पडत नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आदर ठेवण्याचे सौजन्य दाखवू न शकणाऱ्या मंत्री शिवतारे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोध पक्षांनी केली आहे. शिवतारे यांना सत्तेची मस्ती आहे. अंहकार असल्यामुळे जेष्ठ नागरिकांचा अवमान करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. निवडणुकीत त्यांना जनता योग्य ती जागा दाखवून देईल. सर्वसामान्य जनतेमुळे सत्तेत आलेल्या मंत्र्यांना जनतेचा विसर पडल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

प्रतिक्रिया

नितीन नांदगांवकर | ही मस्तवाल वृत्तीचे मंत्री असून वयोवृध्दांशी कसे वागायचे हे यांना माहिती नाही. या मंत्र्यांना सत्तेचा आणि खुर्चीचा माज आला आहे. सामान्य जनतेसोबत कसे वागायचे हे यांना माहित नाही. जनतेने तुम्हाल निवडून दिले आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी देखील असेच वागता का? मी या सर्व प्रकरणाचा निषेध करत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर चिटणीस नितीन नांदगांवकर यांनी म्हटले.

धनंजय मुंडे | मंत्रालय हे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे का केवळ मंत्र्याच्या बडेजाव करण्यासाठी असा प्रश्न पडला आहे. एक तरी राज्याच्या काना कोप-यातून 400-500 किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या जनतेला मंत्रालयात प्रवेशासाठी दोन वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते त्यानंतरही आत गेल्यानंतर कर्मचा-यांचे जेवण नाश्ता चहा पाणी यामुळे त्यांचे काम होईलच याची कोणतीही शाश्वती नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रमुख असलेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी तरी त्यांना सौजन्याची वागणूक द्यावी ही अपेक्षा असताना ते स्वतःच या नागरिकांना अपमानास्पद वागणूक देत असतील तर ही बाब अतिशय चुकीची आहे.
मंत्र्यांसाठी लिफ्ट राखीव ठेवणे हा प्रकार सगळाच होतो याचा मी स्वतः अनेकदा अनुभव घेतलेला आहे राज्याचे मंत्रालय आता सामान्य जनतेचे राहिलेले नसून बडेजाव आणि वेगवेगळे प्रदर्शने मांडणारा बाजार झाला आहे.
मोठमोठे बिल्डर आणि दलालाना पायघड्या घातत्या जातात आणि सामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. मंत्र्याना सत्तेचा माज आला असून आज लिफ्ट बाहेर काढलेली जनता उद्या यांची खुर्ची काढून घेतल्या शिवाय राहणार नाही.

 

जितेंद्र आव्हाड | वयोवृध्द व्यक्तींना मान देणे ही आपली संस्कृती आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी अशा पद्धतीने जर वयोवृध्दांना वागणूक दिली असे तर हे चुकीचे आहे. त्यांनी माफी मागीतली पाहिजे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र महिला अध्यक्ष | या मंत्र्यांना सत्तेचा माज आला असून ज्या जनतेनी यांना सत्ते आणले. त्या मंत्र्यांना जनतेचा विसर पडला आहे. वयोवृध्दांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे. लिफ्ट मधून बाहेर काढून या मंत्र्यांनी त्यांचा अनादर केला आहे. अशा मत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनाम द्यावा असे मत चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. ( राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष )

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम रेल्वेची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनोखी भेट

News Desk

पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळला, ५ जणांचा मृत्यू

News Desk