HW News Marathi
मुंबई

‘या’ कारणाने पोलिसांनी मनसेच्या मोर्च्याचा मार्ग बदलला

मुंबई | राष्ट्रीय नागरित्व नोंदणी कायद्याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारीला (रविवारी) मनसे मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या अपेक्षित मार्गाला मुंबई पोलिसांनी रेड सिग्नल दाखवला होता. या पुर्वी या मोर्च्याचा मार्ग भायखळा ते आझाद असणार होते पण आता गिरगांव चौपाटी-मरिन ड्राईव्ह-आझाद मैदान हा मार्ग वापरण्याची पोलिसांनी सूचना दिली आहे.

मोर्चा काढण्यासंदर्भात मनसेने मुंबई पोलिसांना पत्र दिले होते. या पत्रात राणी बाग ते आझाद मैदान आणि गिरगाव चौपटी ते आझाद मैदान हे दोन मार्ग सूचवण्यात आले होते. “एका मार्गाला पोलिसांनी नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राणी बाग ते आझाद मैदान या मार्गाचा वापर न करण्याची सूचना पोलिसांनी मनसे नेत्यांना केली होती. त्यामुळे गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे,” अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

मनसेने जिजामाता ते आझाद मैदान या मार्गावरुन मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र या मार्गावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मोर्च्याचा विरोध म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. सीएए आणि एनआरसीविरोधातील भावना व्यक्त करणारा हा मोर्चा आहे. भायखाळा परिसरात मुस्लीम वस्ती असल्याकारणाने इथून हा मोर्चा निघाला तर अनुचित प्रकार घडू शकतो. या कारणामुळेच पोलिसांनी हा मनसेच्या या मार्गासाठी हा मार्ग नाकारला आहे. सीएए विरोधात निघणाऱ्या या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता हा मोर्चा शांततेत पार पडणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग

News Desk

दूरदर्शन केंद्राच्या दुसऱ्या मजल्याला आग,अर्ध्या तासातच आग नियंत्रणात

News Desk

संघ आणि भाजपविरोधातील विचारधारेची लढाई !

News Desk