HW News Marathi
मुंबई

वांद्रे येथे इमारत कोसळली, १६ जण जखमी तर दुर्घटनाग्रस्तांना शासनाने मदत करण्याची शेलारांची मागणी

मुंबई | एकीकडे मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे तर दुसरीकडे इमारत कोसळ्याच्या घटना सुरु आहेत. काल (१७ ऑगस्ट) रात्री वांद्रे येथील शेरली राजन रोड इमारत कोसळून इमारतीचे थेट दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळाले.या दुर्घटनेत १६ नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फायर ब्रिगेडच्या ४ गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मध्यरात्रीपासून आतापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरुच आहे.

कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याचा ढिगारा उपसण्यासाठी सध्या ५ जेसीबी, ५ डंपर मागवण्यात आले आहेत. या दुर्घटनेत १६ जण जखमी झाले. त्यापैकी २ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला रात्रीच यश आले. जखमींवर लीलावती आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझ्या मतदार संघातील खार येथील कल्पना ही इमारत कोसळून दुर्घटना घडली. पोलीस, अग्निशमन दल, महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. मीही तातडीने जाऊन पाहणी केली. बचाव कार्य अद्याप सुरु असून नुकसान झालेल्या आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाने मदत करावी,”अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाप्पाच्या मुर्ती साकारण्यास सुरुवात , आदिवासी मुलांना रोजगार

swarit

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतील गैरप्रकाराची न्यायालयीन चौकशी करा | धनंजय मुंडे

News Desk

लोकायुक्तांकडे दररोज दाखल होतात 15 तक्रारी

News Desk