HW News Marathi
मुंबई

ठाणे सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक

मुंबई | मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे दु्र्दैवाने ‘लाईफ घेणारी लाईन’ ठरत आहे. मध्य रेल्वेवर सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाणे रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मुंबई लोकल आणि रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात ठाणे रेल्वे स्थानकावर सर्वाधिक प्रवाशांचे बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे.

एक जानेवारी २०१८ ते १२ मे २०१८ या अवघ्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत ठाणे रेल्वे स्टेशनवर ११२ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ठाणे हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्टेशन असून याच स्थानकावर सर्वाधिक बळी गेल्याचे चित्र समोर आले आहे.

ठाण्यानंतर क्रमांक लागतो तो मध्ये रेल्वेवरीलच कल्याण स्टेशनवर ११० प्रवाशांना अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बोरीवली स्टेशन असून इथे १०७ प्रवाशांनी गेल्या साडेचार महिन्यांत जीव गमावला आहे. बोरीवली हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात ‘जीवघेणं’ स्टेशन ठरले आहे.कुर्ला स्थानक चौथ्या क्रमांकावर असून या रेल्वे स्टेशनच्या हद्दीत ८० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबई विभागात मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या हद्दीत नवीन वर्षात एकूण ९७९ रेल्वेबळी गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

News Desk

Breaking News | वरळीतील साधना मिल कम्पाउंडला भीषण आग

News Desk
देश / विदेश

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

News Desk

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आजपासून दिल्लीतून सुरुवात झाली आहे. अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला अखेरची लढाई असे संबोधले आहे. स्वातंत्र्यांची दुसरी लढाई असे यापूर्वीच्या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. त्यातून केजरीवाल व आप नावाचा पक्ष उदयास आला होता.

यावेळी आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे फलित काय राहणार आहे, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. गेल्या तीन साडेतीनवर्षे अण्णा शांत बसून होते. त्यांनी केंद्राच्या कारभारावर वेळोवेळी टीका केली. परंतु त्याची केंद्राने दखले घेतली नाही. अखेर अण्णांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

शुक्रवारी सकाळी अण्णांनी रामलीला मैदानावर आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत. रामलीला मैदानावर देशभरातून आंदोलक दाखल होत आहेत.

आंदोलन दडपण्यासाठी सरकारने दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांना एकप्रकारे सरकार हिंसेसाठी प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

Related posts

“…. तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू” – जीएसटी संदर्भात अजित पवारांचा इशारा

News Desk

आता महाराष्ट्रासह भगतसिंह कोश्यारींकडे आणखी एका राज्याची जबाबदारी 

News Desk

इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार

swarit