HW News Marathi
मुंबई

ठाणे सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक

मुंबई | मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे दु्र्दैवाने ‘लाईफ घेणारी लाईन’ ठरत आहे. मध्य रेल्वेवर सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाणे रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मुंबई लोकल आणि रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात ठाणे रेल्वे स्थानकावर सर्वाधिक प्रवाशांचे बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे.

एक जानेवारी २०१८ ते १२ मे २०१८ या अवघ्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत ठाणे रेल्वे स्टेशनवर ११२ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ठाणे हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्टेशन असून याच स्थानकावर सर्वाधिक बळी गेल्याचे चित्र समोर आले आहे.

ठाण्यानंतर क्रमांक लागतो तो मध्ये रेल्वेवरीलच कल्याण स्टेशनवर ११० प्रवाशांना अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बोरीवली स्टेशन असून इथे १०७ प्रवाशांनी गेल्या साडेचार महिन्यांत जीव गमावला आहे. बोरीवली हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात ‘जीवघेणं’ स्टेशन ठरले आहे.कुर्ला स्थानक चौथ्या क्रमांकावर असून या रेल्वे स्टेशनच्या हद्दीत ८० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबई विभागात मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या हद्दीत नवीन वर्षात एकूण ९७९ रेल्वेबळी गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार

News Desk

प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत

News Desk

हॉटलेमध्ये फुकट जेवणा-या गुंडाच्या खात्मा

News Desk