HW News Marathi
मुंबई

मुंबईतील अनेक हॉटेलमधे ग्राहकांची फसवणूक !

मुंबईः भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरातदेखील मोठी घसरण झाली आहे. सध्या भाज्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी उतरले आहेत. दुसरेक़डे परराज्यातील कांदा महाराष्ट्रात आल्याने कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात आले आहेत.

असे असताना मुंबईतील अनेक हॉटेलचालक ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार दादर परिसरातील हॉटेलमध्ये दिसून आला आहे. महागाईच्या नावाखाली अनेक ठिकाणी कांद्याऐवजी मुळा किंवा कोबी दिली जात आहे. दादर पूर्व भागात अनेक हॉटेल्स असून त्याठिकाणी दिवसभर ग्राहकांची गर्दी असते.

बाहेर गावावरून आलेल्या ग्राहकांना कांदा देण्याऐवजी मूळा, कोबी सर्व केला जातो. ही फसवणूक असल्याची तक्रार केल्यास संबंधित ग्राहकांना कांदा दिला जातो. कांदा पन्नास ते साठ रुपये किलो असल्याचे सांगून बोळवण केली जाते. परंतु सध्या कांदा वीस रुपये किलो असून छोटे-मोठे स्टॉलधारक कांदा लिंबू ग्राहकांना देतात, परंतु मोठे हॉटेल्स ते देण्याचे टाळत आहेत.

दुसरीकडे वाढलेल्या दराचा फायदा घेत ग्राहकांकडून साध्या साध्या भाज्यांसाठी दीडशे ते दोनशे रुपये आकारले जात आहेत. ही शुद्ध फसवणूक असल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली. परंतु मालकवर्ग अरेरावी करून याकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत काही ग्राहक ग्राहक मंचाकडे तसेच अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौरी लंकेश हत्येचा मुंबई पत्रकार संघाकडून निषेध

News Desk

सरकार उलथविण्याचा माओवाद्यांचा होता कट

News Desk

पावसाळापूर्व कामांची पाहणी करण्याचे आयुक्तांचे आदेश

swarit