HW News Marathi
Covid-19

मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा, प्रवाशांची विभागणी होणार – विजय वडेट्टीवार

मुंबई | कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारने निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) संध्याकाळी महत्वाची बैठक बोलावली असून यावेळी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकल बंद होणार का हा प्रश्न मुंबईकरांना सतावत असून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोरोनाचे दररोज ३५ ते ४० हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. गर्दी कशी कमी होईल, यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी त्यांना मुंबई लोकलबाबत प्रश्न विचारला असता, मुंबई लोकल बंद होणार नाही, लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

“लोकलसंदर्भात मागील वर्षी आपण निर्णय घेतला होता. आपण विभागणी केली असून वेळेनुसार प्रवासाला मुभा दिली आहे. त्यामध्ये मग आरोग्य विभाग, रेस्तराँ, कर्मचारी, चाकरमानी यांचा समावेश होता. जी मागील वेळी उपाययोजना केली होती यावेळीही तशीच करणार आहोत”. यावेळी त्यांनी मुंबई लोकल बंद होणार नाही अशी माहिती दिली. “लोकल बंद होणार नाही, पण त्यावर निर्बंध लावले जातील आणि त्याचं वेगळ्या पद्धतीने नियोजन केलं जाईल. गर्दी कमी करुन लोकांना सुविधा देण्यावर भर असेल,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

विजय वडेट्टीवार सध्या नागपुरात आहेत. नागपुरातील रुग्णवाढ चिंतेची असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. २५ वर्षांच्या आतील तरुणांना संसर्ग होत आहे. इतकंच नाही तर लहानग्यांनाही कोरोना होत असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. रुग्णवाढ होत असताना थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे ८० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत, असं त्यांनी नमूद केलं.

महापौरांचे संकेत –

कोरोना संक्रमणाचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी काही कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. “रेस्तराँ ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर लोक जर योग्य प्रतिसाद देत नसतील, तर धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात येतील,” असं महापौर म्हणाल्या.

“मुंबईतील लोकल प्रवासावरही निर्बंध आणले जाऊ शकतात. पूर्वीप्रमाणेच फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाची मूभा दिली जाऊ शकते. त्याचबरोबर लोकांकडून करोना नियमावलीचं पालन केलं जात नसल्यानं मॉल्स आणि थिअटर बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो,” असंही महापौर पेडणेकर यांनी यांनी सांगितलं. नव्या निर्बंधासंदर्भात २ एप्रिल रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाबाधित रुग्णांवर ‘या’ औषधाचा होत आहे चांगला परिणाम

News Desk

पुण्यातील १५ हजार स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार

News Desk

राज्यात आज ११ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk