HW News Marathi
मुंबई

अतिवृष्टीत काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची  ज्ञानदा प्रबोधन संस्थेने घेतली दखल

मुंबई | दादर येथील सानेगुरुजी शाळेबाहेरील रस्त्यावर वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यासाठी आलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात जीवाची पर्वा न करता त्यांचे काम सुरूच ठेवले. आजू बाजूच्या इमारतीमधील रहिवाश्यांनी हातात छत्री घेऊन स्वतःची पावसापासून काळजी घेत त्यांचे काम बघण्यासाठी गर्दी करून एकाही व्यक्तीला त्यांची दया आली नाही उलट त्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सूनवण्यासाठी एकही संधी रहिवाश्यांनी सोडली नाही.

लोकांच्या मनात एकच विचार होता तो म्हणजे ‘भरघोस पगार घेतात ना हे कर्मचारी मग भिजून काम करतात ते मेहेरबानी नाही करत.’ वास्तविक २०-२५ हजार प्रतिमहा मिळणाऱ्या पगाराने जीव नाही विकत मिळत हे अश्या लोकांना न समजणे म्हणजे ही लोक किती मूर्ख आहेत हे कळते. भिजणाऱ्या त्या सर्व कर्मचाऱ्यांचा देखील जीव आहे मग जर ते आपला जीव झाडांपासून वाचवत असतील तर त्यांना किमान एक कप चहा आपण नाही देऊ शकत का ?

बृहन्मुंबई महानगर पालिका जी उत्तर विभाग , वृक्ष छाटणी विभागाचे अधिकारी अमित करंदीकर आणि त्यांचे कर्मचारी साने गुरुजी शाळेबाहेर वाढलेल्या वृक्षाच्या फांद्यांची छाटणी करत होते त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जनार्दन पळ यांनी साने गुरूजी शाळेतून चहा आणि बिस्कीटची व्यवस्था या कर्मचाऱ्यांनसाठी केली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी साने गुरुजी शाळेचे आभार मानले. यावेळी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी शाळेचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच कृपया सर्व नागरिकांनी आपल्या पालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दल कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती देखील केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारणारी भाषा ही मराठीच होती

swarit

मुंबई पोलिस वाय-फाय युक्त

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा शिवसेनेत गटात प्रवेश

Aprna
कृषी

‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

News Desk

मुंबई | ‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध स्वस्त झाल्याने त्रस्त आहेत. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची मागणी शेट्टींनी केली आहे.दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला.

“घरातले दूध आणि भाजीपाला रस्त्यावर कशाला ओतता?” असा सवाल करत दूध रोखणे ही शेतकरी आंदोलनाची पद्धत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्यानुसार शासन होईल असेही चंद्रकांत पाटील सांगायला विसरले नाहीत. यापूर्वी राजू शेट्टींनी प्रामुख्याने पुणे, नाशिक अहमदनगर वरून जाणारे दूध रोखणार असल्याचे सांगितले होते. तर कर्नाटक , गुजरात, हैद्राबाद वरून मुंबईला येणारं दूध रोखणार असल्याचा इशारा दिलाय. तसेच दूध संघांनी आमच्या आंदोलनाला विरोध करू नये. तसे केल्यास कायदा हातात घेणार असल्याचे म्हटले आहे.

Related posts

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk

अर्थसंकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंद

News Desk

फळं खरेदीसाठी चीनी व्यापारी शेतक-यांच्या बांधावर

News Desk