HW News Marathi
मुंबई

परप्रांतीयांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार नाही | आठवले

मुंबई । मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसेने “निरुपम म्हणजे भटका कुत्रा”असा मजकूर लिहून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल करून संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे. “उत्तर भारतीयांनी मुंबईत काम केले नाही तर मुंबई बंद पडणार हे मान्य नाही,” असे भारतीय रिपब्लिकन पक्ष या पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. “निरुपम यांनी मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांमध्ये वाद निर्माण करून देऊ नये. असा वाद निर्माण केल्यास काँग्रेसला काही फायदा होणार नाही. त्या उलट मराठी भाषिक त्यांचा विरोधच करतील,” असेही रामदास आठवले म्हणाले आहेत. “उत्तर भारतीयांचे मुंबईला मोठे योगदान आहे, यात दुमत नाही. परंतु त्यांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार हे मला मान्य नाही,” असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

काय होते संजय निरुपम यांचे वादग्रस्त वक्तव्य

“उत्तर भारतीय कोणत्याच कामात मागे नाहीत. सगळ्या क्षेत्रात ते सक्रिय आहेत. उत्तर भारतीय लोक टॅक्सी-रिक्षा चालवण्यापासून दूध विकण्यापर्यंतची सगळी काम ते करतात. फळ, भाजी, वर्तमानपत्र विकणे अशी सर्वच कामे उत्तर भारतीयच समाज करतो. मुंबईकरांचा भार उत्तर भारतीय त्यांच्या खांद्यावर घेऊन चालत असतो. बांधकाम क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयच असतात. जर कधी उत्तर भारतीयांनी ठरवले की काम करायचे नाही. तर मुंबई आणि महाराष्ट्र ठप्प पडेल. मुंबईकरांना जेवायला सुद्धा मिळणार नाही”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ऑडिट झाल्यास सत्य बाहेर येईल !

News Desk

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

Gauri Tilekar

खातूंची कार्यशाळा आता नव्या जागेवर

swarit