HW News Marathi
मुंबई

मुंबईची तुंबई झाल्यास राज्यसरकार जबाबदार

मुंबई | महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पावसाळ्यापुर्वी मुंबईतील नालेसफाईची पहाणी केली. पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास त्याला महापालिका प्रशासन नव्हे तर राज्यसरकार जबाबदार असेल असे वक्तव्य महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले . महापौरांनी मान्सून अवघ्या काही दिवसात मुंबईत दाखल होण्याची चिन्हे असल्यामुळे नाले सफाईच्या कामाची पाहणी केली.

मुंबईत मेट्रो आणि मोनोरेल मुळे ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी भरले तर त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल असेही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे महापौरांच्या या आरोपावर सरकार काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

काँग्रेसचा माजी आमदार भाजपाच्या गळाला

News Desk

अदानीकडून मीटर तपासणी न करताच वीजबिलांचे वितरण ?

News Desk