HW News Marathi
मुंबई

मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार

मुंबई | मुंबईतील वाढत्या गर्दीचा लोकलवर पडणारा ताण लक्षात घेता उपनगरीय लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याच्या सूचना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गोयल यांची बैठक झाली. या बैठकीत गोयल यांनी हे आदेश दिले आहेत. यासाठी येत्या दोन आठवड्यात योजनाबद्ध आराखडा सादर करण्याचे आदेशही मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोयल यांनी दिले. या निर्णयामुळे मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील १२ डब्यांच्या गाड्यांची क्षमता तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची आहे. पण गर्दीच्या वेळी सुमारे साडेपाच हजार प्रवासी एका गाडीतून प्रवास करतात. तर १५ डब्यांच्या गाड्यांची प्रवासी वाहन क्षमता ही ४, २०० इतकी आहे. पण या गाड्यांमधून सुमारे ७ हजार प्रवासी गर्दीच्या वेळी प्रवास करतात. सध्या पश्चिम रेल्वेकडे सध्या फक्त ५ लोकल गाड्या १५ डब्यांच्या आहेत. या १५ डब्यांच्या गाड्यांच्या दिवसातू ५४ फेऱ्या होतात. तर मध्य रेल्वेकडे फक्त एकच लोकल १५ डब्यांची आहे.

मध्य आणि पश्मिच रेल्वेच्या जलद मार्गावर या १५ डब्यांच्या लोकल सुरुवातीला धावतील. यानंतर धीम्या मार्गावरही १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या पार्श्वभूमीचं विश्लेषण

News Desk

युवासेनेनं मुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळं फासलं

News Desk

लोकलने सिग्नल तोडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit
राजकारण

#MarathaReservation : मुख्यमंत्र्यांकडून एटीआर सादर, दुपारनंतर चर्चा

News Desk

मुंबई | महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित असा मराठा आरक्षणाच्या एटीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पटलावर मांडला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी एटीआरवर दुपारनंतर चर्चा करू असे म्हटेल आहे. विधिमंडळाच्या अध्यक्षांनी सभागृह स्थगित केले असून १.३०नंतर मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. शिक्षण आणि नोकरी या दोन क्षेत्रांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात आहे, अशी माहिती मिळत आहे.

मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करणारा अहवाल दिल्यानंतर, त्यावर सरकारने केलेल्या कृती अहवाल(एटीआर) कायद्याच्या प्रतीसोबत मांडण्यात आला आहे.राज्यातील अत्यंत संवेदनशील मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणासाठी आज निर्णायक दिवस आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रीमंडळाची उपसमिती नेमण्यात आली होती.

Related posts

#LokSabhaElections2019 : मुलासाठी संघर्ष उभा राहणे चुकीचे !

News Desk

राजकारणात बदलली उपोषणाची व्याख्या

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…धुळे मतदारसंघाबाबत

News Desk