HW News Marathi
मुंबई

मुंबईत ३०-३१ जानेवारीला २४ तास पाणीकपात

मुंबई – मुंबईत ३० जानेवारी रोजी सकाळी १० ते ३१ जानेवारी सकाळी १० वाजेपर्यंत पालिकेच्या १२ प्रभागांतील (Ward’s) रहिवाशांसाठी पाणी कपात करण्यात येणार आहे. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत या ठिकाणी पुरवठ्याचा दाब (supply pressure) कमी होईल, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे.

 

पश्चिम उपनगरातील (Western Suburbs) नऊ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी बंद (Water Cut off) करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे (Brihanmumbai Municipal Corporation) हायड्रोलिक इंजिनीअर पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. सर्व रहिवासी व इतर कनेक्शनधारकांनी पाणी साठवून त्याचा विवेकाने वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडारकर संस्थेत तोडफोड करणारे संभाजी ब्रिगेडचे ६८ जण निर्दोष

News Desk

परेल येथील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चार जणांचा मृत्यू

News Desk

परिवहन मंत्री राजीनामा द्या,एसटी संपातील वाहकाचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीचा बळी!: विखे पाटील

News Desk