HW News Marathi
मुंबई

एलएलएमच्या विद्यार्थ्यांच्या एक्सट्रा लेक्चरमध्ये प्राध्यापकांची दांडी

मुंबई – मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या विद्यार्थांच्या अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारी लेक्चर ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांचे ६ ग्रुप बनविण्यात आले होते. पण फक्त २ ग्रुपचे प्राध्यापक आले नव्हते. विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दुपारी २ वाजता लेक्चरसाठी पोहचले होते. पण, सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राध्यापक न आल्याने विद्यार्थ्यींनी निराश होऊन घरी परतले.

मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लावल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली होती. तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण न होताच विद्यापीठाने १७ जानेवारी रोजी परीक्षा जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी परीक्षा पुढे ढकलली आहे.

एलएलएमच्या परीक्षा २३ जानावारीपासून सुरू होणार आहे. यालाही विद्यार्थ्यांनी विरोध केला असून परीक्षेवर बहिष्कार टाकणार आहेत. विद्यापीठसाठी सोमवारी १५ जानेवारीपासून ते २२ जानेवारीपर्यंत दुपारी २ ते रात्री ७ वाजेपर्यंत एक्सट्रा लेक्चर्स ठेवण्यात आले असून २३ जानेवारीला एलएलएमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकरी पशुपालकांसाठी लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना

Aprna

मुंबईतील १२ हजार इमारती पंचाहत्तरीच्या!

News Desk

बीएमसी आयुक्तांना मुख्यमंत्री वाचवतायत – संजय निरूपम

News Desk
राजकारण

नितेश राणेंनी महापालिकेवरील मोर्चा पुढे ढकलला

swarit

मुंबई – कमला मिल कम्पाऊंडमधील ‘वन अबव्ह’ व ‘मोजोस बिस्ट्रो’ या दोन रेस्टो पबला आग लागून त्यात १४ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. ‘हुक्का पार्लर’मुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने ‘हुक्का पार्लर’ हटाव या मागणीसाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या कार्यालयावर मोर्चाचे १५ जानेवारी रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र महापालिकेने हुक्का पार्लर विरोधात कारवाई सुरू केल्यामुळे तूर्तास हा मोर्चा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

‘कमला मिल कम्पाऊंड’मध्ये आग लागली त्याच दिवशी आमदार नितेश राणे यांनी या आगीमागे ‘हुक्का पार्लर’ असावे, अशी शक्यता वर्तविली होती. पुढे झालेल्या तपासात त्याला पुष्टी मिळाली. ‘हुक्का पार्लर’मुळे १४ जणांना प्राण गमवावा लागला. या घटनेने अस्वस्थ झालेले आमदार हितेश राणे यांनी मुंबईतील सर्व ‘हुक्का पार्लर’ बंद करावेत या मागणीसाठी मुंबई महापालिकेवर महामोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चाची तयारीही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. ‘हुक्का पार्लर’बाबतचे गांभिर्य महापालिका आयुक्त आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने १० ते १२ जानेवारी दरम्यान सह्यांची मोहीम घेण्यात आली.

दरम्यान, या मोर्चाच्या घोषणेची आणि सह्यांच्या मोहिमेची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या वतीने ‘हुक्का पार्लर’ आणि हॉटेलमधील अन्धिकृत बांधकामाविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनानेही या प्रकरणातील गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरू केली आहे. म्हणून तुर्तास हा मोर्चा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ की ज्योतिरादित्य नक्की कोण होणार मुख्यमंत्री

News Desk

जयकुमार रावलच्या पदाचा राजीनाम्याची मागणी – नबाव मलिक

News Desk

शिवसेना आजही आपल्या भूमिकेवर ठाम

News Desk