HW News Marathi
मुंबई

मुंबईचे पाहुणे, फ्लेमिंगो पक्ष्यांची शिकार

मुंबई | मुंबईत दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे फ्लेमिंगो या पक्ष्यांची संख्या कमी झालेली आहे. या पक्ष्यांची शिकार देखील केली जात आहे, असाच काहीसा प्रकार मुंबईतील मालाडमध्ये समोर आला आहे. मालाड मधील कांदळवन परिसरात आश्रय घेतलेल्या फ्लेमिंगो पक्षांच्या जीवावर बेतला.

मुंबईत पाहुणे म्हणून आलेल्या मुक्या पक्ष्यांना बंदुकीने ठार मारले जात आहे. मालाडच्या कांदळवनात आश्रय घेतलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या शिकाऱ्यांना कॅमेऱयात कैद केले असून ‘पॉज’ या पशूप्रेमी संघटनेने यासंदर्भात पोलीस आणि वनखात्याकडे तक्रार करून या शिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मालाड पश्चिमेच्या जनकल्याण नगरातील कांदळवनात परदेशी फ्लेमिंगो पक्षी आश्रयासाठी आले आहेत.

मालाडच्या जनकल्याण नगराजवळील मालवणी गावातील ९० फूट रोडवर खाडीकिनारी मरीना कंपाऊंड आहे. तेथील सोनाटा इमारतीजवळून मंगळवारी दुपारी सवा एक वाजताच्या सुमारास काही लोक हातात बंदूक घेऊन कांदळवनाच्या दिशेने जाताना स्थानिकांनी पाहिले. या लोकांनीनंतर कांदळवनात फ्लेमिंगोंची शिकार केल्यानंतर मृत झालेल्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून घेऊन गेले. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये फ्लेमिंगो या पक्ष्यांचा समावेश शेडय़ुल ५ मध्ये होतो. त्यांच्या शिकारीला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे यासंदर्भात ‘पॉज’ संघटनेच्या निशा पुंजू यांनी पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह संबंधितांकडे तक्रार केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कॉपी तपासण्याच्या नियमात बदल | तावडे

News Desk

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्रामास मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Gauri Tilekar

केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल होणार; उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार

Aprna
महाराष्ट्र

मुंबईत गेल्या पाच वर्षांपासून महिला अपहरणात वाढ | मुख्यमंत्री

News Desk

मुंबई | गेल्या पाच वर्षात मुंबईत मुली हरविणे आणि अपहरणाच्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत ही धक्कादायक आकडेवारी मांडली. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबईत २०१३ मध्ये १८ वर्षाखाली वयोगटातील हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलींची संख्या ९२ होती. तर २०१४ मध्ये १५०० झाली तर २०१७ साली १३६८ होती. २०१३ ते २०१७ मध्ये या काळावधीत १८ वर्षाखालील वयोगटातील एकूण ५०५६ मुलींचे अपहरण आणि हरविलेल्या घटनांची आकडेवारी आहे. त्यापैकी ४७५८ मुली सापडल्या असून ३७० मुली बेपत्ता आहेत.

तसेच २०१३ ते २०१७ या कालावधीत १८ वर्षाखालील वयोगटातील मुला-मुलींचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावण्याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता. परंतु त्यापैकी फक्त २ जणांवर गुन्ह्यात दोषी सिद्ध झाले आहेत. तर एक आरोपी दोषमुक्त करण्यात आले. या कालावधीत मुलींचा अनैतिक कृत्यासाठी वापर केल्याचे एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले.

Related posts

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले, EDचा मोठा खुलासा

News Desk

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी – खा. संभाजीराजे छत्रपती

News Desk

राज्याला रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार पण…

News Desk