HW News Marathi
मुंबई

अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात पालिका अपयशी

मुंबई | मुंबईत बेकायदेशीर इमारती ही एक मोठी समस्या आहे. दरवर्षी पालिका अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने हजारोच्या संख्याने बेकायदेशीर इमारती बांधण्यास पालिका स्वतः परवानगी देऊन भ्रष्टाचार तर करते. हे बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्यासाठी देखील मुंबई महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु हे कोट्यावधी रुपये बेकायदेशीर बांधकाम खर्च न होता ते पैसे कुठे जातात असे अनेक प्रश्न आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी उपस्थिती केले आहे. पालिका कडेकोट पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम निष्कासित करतात.

पालिकेने अनधिकृत बंधकामे निष्कसित करण्यासाठी मुंबई पोलीस दलाला बंदोबस्तसाठी २०१६ मध्ये १० कोटी, १ लाख ६८ हजार ९१९ रुपये दिले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी उघडकीस आणली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई महानगरपालिका इमारत व कारखाना विभाग आणि पोलीस बंदोबस्त तसेच इतर साधनांनवर प्रत्येक वर्षी सुमारे २० कोटी रुपये खर्च करतात. परंतु बेकायदेशीर बांधकाम / इमारत निष्कासन कारवाई तितकेच पैसे खर्च करण्यात उधासीन दिसते.

मुंबई महानगरपालिकेला अवैध बांधकामावर दरवर्षी १५,००० पेक्षा अधिक नोटीस बजावतात, पण १० ते २० टक्के अवैध बांधकामावर निष्कासन कारवाई केली जाते. काही अवैध बांधकामावर पालिकेकडून बोगस कारवाई देखील सुद्धा केली जाते. उर्वरित अवैध बांधकामावर मनपा कधी कारवाई करणार? आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेचे आयुक्त, अजॉय मेहता यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रत्येक वार्डमध्ये असणारे अधिकारी हे आपल्या सोई नुसार कारवाई करतात अशी टीका विरोधीपक्ष रवी राजा यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk

लोअर परळचा पूल पदचाऱ्यांसाठी खुला

News Desk

ओला-उबेर चालक असंख्य मागण्यासाठी रस्त्यावर, बेमुदत बंदचा इशारा

swarit
राजकारण

कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त सरकार

News Desk

बंगळुरु | जेडीएसचे एच डी कुमारस्वामींना बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर सस्था कोण प्रस्थापित करणार मुख्यमंत्री पद कोणत्या पक्षाकडे रहाणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. बुधवारी जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री तर कॉंग्रेस नेते जी परमेश्वर यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बंगळुरुत बुधवारी भव्य असा हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल वजूभाई वाला यांनी एच डी कुमारस्वामी आणि जी परमेश्वर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी ५५ तासांचे मुख्यमंत्री पद भुषविल्यानंतर १९ मे रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बुधवारी औपचारिकरित्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस-जेडीएसचे सरकार सत्तेत आले आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जींसह दिग्गज उपस्थित होते.

Related posts

अनिल अंबानी मोठ्या आर्थिक संकटात, दोन कंपन्यांच्या खात्यात १९ कोटी

News Desk

प्रेक्षक गॅलरीतून दिसणारे मुंबईचे दृश्‍य डोळ्याचे पारणे फेडणारे !

News Desk

केजरीवालांवर ६ कोटींना लोकसभेचे तिकीट विकल्याचा गंभीर आरोप

News Desk