HW News Marathi
मुंबई

टाटा पॉवरच्या मदतीने राबवली ‘खिळेमुक्त झाडे’ मोहीम

मुंबई | अंघोळीची गोळी या उपक्रमाच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी टीम मुंबई ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन लोकांना पाण्याचे महत्व पटवून देत असते. ह्याच अंघोळीच्या गोळीच्या टीमने नुकतेच मुंबई मधील विविध शहर परिसरात झाडांवरील खिळे काढण्याचा सुत्य उपक्रम टाटा पॉवरच्या मदतीने पार पाडला आहे.

झाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत पण फक्त त्यांना बोलता येत नाही त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत. परंतु त्यांच्या वेदना आम्हांला ऐकू येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगत खिळेमुक्त झाडाच्या संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम पहिल्यांदा दादर येथे राबवला. याच युवकांनी एकत्र येऊन मुंबईत विविध शहरांत झाडांवरील खिळे काढण्याचा प्रयत्न केला.

हा उपक्रम थोड्या काळापुरता मर्यादित नसून मुंबईतील विविध भागात तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित अशा प्रकारचे उपक्रम राबवावे, असे आवाहन अंघोळीची गोळी टीमने यावेळी केले आहे. पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडे मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. नुकतेच टाटा पॉवरच्य मदतीने चेंबूर स्टेशन ते डॉ. आंबेडकर गार्डन, डायमंड गार्डन ते क्यूबिक मॉल, आजाद बाग ते वाशी नाका आणि डायमंड गार्डन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या परिसरात खिळेमुक्त झाडे ही मोहीम राबविण्यात आली आहे.

खिळेमुक्त झाडे मोहिमेचे मुंबई जिल्हा समन्वयक तुषार वारंग आणि अंघोळीची गोळी संस्थेच्या सदस्य विधी गोलटकर यांनी या संपुर्ण मोहिमेच्या समन्वयाचे काम पाहिले. यापुढील काळात अनेक शहरांत खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त आणि आळेयुक्त झाडे ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे यावेळी तुषार वारंग यांनी सांगितले. टाटा पॉवरचे अनिल जैन, शिरीष कामत, हिरेन चव्हाण, नरेश पाटील, अंजली वजीर, सुरेश झोपे, गणेश सोडे यांनी या मोहिमेत नागरिकांना या मोहिमेची गरज आणि आजच्या काळातील उपयुक्तता समजावुन सांगण्यासाठी प्रयत्न केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

swarit

जखमी गोविंदांची सांस्कृतिक मंत्र्यांनी घेतली भेट

swarit

महापालिकेच्या पत्रकार कक्षाला कुलूप, मनसेचा पालिकेत धिंगाणा

News Desk
क्राइम

पीएनबी बँकेने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे ‘मी कर्ज फेडू शकत नाही’ – नीरव मोदी

swarit

मुंबई – पंजाब नॅशनल बँक घोटळा प्रकरणात पहिल्यांदा नीरव मोदीने मौन सोडले आहे. पीएनबी बँकेला पत्र लिहून ‘बँकेने हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी कर्ज फेडू शकत नाही’असे या पत्रात म्हटले आहे. पीएनबीचे ५ हजार कोटीपेक्षा कमी कर्ज असल्याचा दावा ही मोदींने पत्रात केला आहे.

“पत्नी आणि मामा मेहुल चोक्सी या दोघांचाही या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना त्यांना यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मामाचा व्यवसाय हा पूर्णपणे वेगळा आहे. त्या सर्वांना माझ्या बँकेतील व्यवहारांविषयी काहीही माहिती नाही,” असे ही नीरव मोदीने म्हटले आहे.

नीरव मोदीने पीएनबी बँकेला तब्बल ११,५०० कोटीचा चुना लावल्याने ईडीने मोदींच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आली आहे. या छप्यात मोदींच्या गितांजली जेम्स या शोरूममधून ५१०० कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने हस्तगत केले. त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील जप्त केल्या आहेत.

 

Related posts

जळगावात पोलीस आपसात भिडले

News Desk

अंबानींच्या कुटुंबीयाना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna

स्व:ताच्या मुलीवर बापाने केला बलात्कार

News Desk