HW News Marathi
मुंबई

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष

मुंबई | सालाबादाप्रमाणे यंदाही वरळीच्या कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांमध्ये सणाचा जल्लोष पहायला मिळत आहे. बंदरावर मासेमारी साठी जाणारे कोळी दर्याला नैवेद्य म्हणून नारळी पौर्णिमेला सोन्याचा नारळ वाहतात. कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो. पारंपारिक गोडधोड पदार्थ, नाच गाण्यांचा जल्लोष आणि कोळी बांधवांचा त्यांच्या कोळीवाड्यातील माहोल हा बघण्याजोगा असतो. एच. डब्लू मराठी कडून सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

(छायाचित्र- रिपोर्टर धनंजय दळवी)

नारळी पौर्णिमेनिमित्त होणारी सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा कोळी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची असते. मुंबई व आसपासच्या कोळीवाड्यात आज पारंपारिक कोळीगीते गात सूर्यास्ताच्या वेळेला रुमाल कमरेला बांधलेली पुरुष मंडळी तर महिला नऊवारी साड्या नेसतात आणि सोन्याचे दागिने घालून सजतात.

तसेच या दिवशी कोळी बांधव आणि समुद्रकिनारी रहाणारे लोक समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक असून ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानले जाते. आज वरळी कोळीवाड्यात देखील असाच उत्साह पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल मधून पडून एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

News Desk

उबरचे मुंबईतील कार्यालय कायमस्वरूपी बंद

News Desk

अतिवृष्टीत काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची  ज्ञानदा प्रबोधन संस्थेने घेतली दखल

News Desk