HW News Marathi
मुंबई

नाणार प्रकल्प होऊ देणार नाही: राणे

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण आणि कोकणातील जनतेला उद्धस्त करणारा नाणार ग्रीन रिफायनी प्रकल्प कदापि होऊ देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. प्रकल्पासाठी जमिनी अधिगृहित करण्यासाठी येथील शेतकºयांना थेट मातोश्रीमध्ये बोलावून धमकावण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. ज्या कोकणाच्या जीवावर शिवसेना वाढली, सत्तेत आली, तेथील नागरिकांना पैशांसाठी उद्धवस्त करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे राणे म्हणाले.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचे पुरावे सादर केले. राज्याचे ‘उद्योगी’मंत्री सुभाष देसाई आणि केंद्रातील अवजड उद्योगमंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पाबाबत शिवसेना दुटप्पी वागत आहेत. एकीकडे विरोध दर्शवायचा आणि दुसरीकडे जमीन अधिगृहण करण्यासाठी शेतकºयांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईतलं जिना हाऊस तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा – आ. लोढा

News Desk

पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या; विनोद तावडेंची माहिती

swarit

शिक्षण उपसंचालकाला ११वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या मुदतवाढीसाठी घेराव.

News Desk
राजकारण

धनंजय… या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा

swarit

लातूर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम असून हल्ल्याबोल यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनाही आज त्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एरवी सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अजितदादांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना , धनंजय तूच या खड्ड्यांचे सेल्फी काढ अन चंद्रकांत दादांना पाठव रे बाबा म्हणत सेल्फीत भाग घेत आपली नाराजी दाखवली.

आज औसा (लातूर) येथील हल्लाबोल सभा झाल्यानंतर निलंगामार्गे उदगीरला जात असताना अजितदादांना रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. रस्त्यांची परिस्थिती पाहून निराश झालेल्या अजितदादांनी रस्त्याची पाहणी करण्यासाठी उतरले. यावेळी धनंजय मुंडे यांनी दादांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चालवलेल्या #selfiewithpotholes अभियानाची आठवण करुन दिली. त्यावर दादांनी गंमतीदार उत्तर दिले. “धनंजय… आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांचे काय हाल होत असतील? मला काही ते सेल्फी बेल्फी जमत नाही. तूच या खड्ड्यांचा सेल्फी काढून त्या चंद्रकांत पाटलांना पाठव रे बाबा…” असे सांगितले. सोशल मिडियावर सक्रिय असलेल्या मुंडे यांनी मग तात्काळ आपल्या फोन मधून त्या खड्ड्यांसह सेल्फी काढत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटर वर पाठवला….

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यात सुरु आहे. उस्मानाबाद, बीड आणि आज लातूर जिल्यात हल्लाबोल सभा झाल्या. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व नेते मराठवाड्यात आहेत. कालच भूम ते पाटोदा प्रवास केल्यानंतर पाटोदा येथील सभेत अजितदादांनी खड्ड्यावरून सरकारवर टिका केली होती. मराठवाड्यात रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही, असं ते म्हणाले होते.

मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा, असे आवाहन केले होते. त्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोशल मिडियावर #selfiewithpotholes असे कँम्पेन चालवले. ज्याला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. माध्यमानिही दखल घेतली. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यात एक खड्डा दिसणार नाही, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा ही डेडलाईन पुढे ढकलून १५ जानेवारी करण्यात आली. मात्र आजही मराठवाड्याच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे आपल्या बघायला मिळतात.

आता स्वतः माजी उपमुख्यमंत्री यांनीच रस्त्यातील खड्ड्याची सेल्फी काढून पाठवल्याने चंद्रकांत दादा त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Related posts

राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक

News Desk

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

News Desk

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

News Desk