HW News Marathi
मुंबई

परळ आणि एलफिन्स्टन स्थानकांना जोडणार नवीन पुल

मुंबई | गतवर्षी एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने भारतीय लष्कराच्या मदतीने नवीन पुल उभारला असून परळ आणि एलफिन्स्टनला जोडणारा नवीन पुलाचे काम देखील शेवटच्या टप्प्यात आले आहे.

गतवर्षी झालेल्या चेंगराचेंगरीची पुनवृत्ती होऊ नये म्हणून सरकारने नवीन प्लॅटफॉर्मची निर्मीती केली आहे. या प्लॅटफॉर्मला भारतीय लष्कराच्या मदतीने बांधलेला पुल जोडला असून अजून एक मोठा पर्यायी परळ आणि एलफिन्स्टन (प्रभा देवी) पुलाला जोडणा-या नवीन पुलाचे काम सुरु आहे. या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. या नवीन पुलामुळे जुन्या पुलावर होणारी गर्दी कमी होईल असे बोलले जात आहे.

जुना प्लॅटफॉर्म क्र.१ बंद

जुना प्लॅटफॉर्म क्र. १ बंद केला असून या प्लॅटफॉर्मवर लोखंडी जोडपुल बनविला आहे. हा पुल प्लॅटफॉर्मच्या उंचीचा बनविण्यात आला आहे. जेणे करुन प्लॉर्टफॉर्म क्र. २ वरील प्रवाश्याला सहज नवीन प्लॅटफॉम क्र.१वर पोहचने शक्य होईल.

परळ रेल्वे स्थानक हे वर्दळीचे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकात जास्त गर्दी दिसून येते. नवी प्लॅटफॉर्म बनविल्यामुळे आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. परळ रेल्वे स्थानकात सकाळी ऑफिसला जाणा-यांची आणि सायंकाळी घरी जाणा-यांची प्रचंड गर्दी असते. या पुलामुळे आम्हा प्रवासांना प्रवास करणे सोपे झाले आहे अशी प्रतिक्रीया धवल सोळंखी या प्रवाशाने दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सायन स्टेशनजवळ एलबीएस मार्गावर आग, जिवीतहानी नाही

News Desk

गिरगावच्या कोठारी हाऊस इमारतीला आग

swarit

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर दिवसाकालीन ब्लॉक रद्द

News Desk
शिक्षण

मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागणार, अभाविपला कुलगुरूंचे आश्वासन

swarit

मुंबई | गतवर्षी मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीर लागले होतेच. परंतु निकालातल्या गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. या सर्व प्रकारामुळे मुंबई विद्यापीठाची प्रतिमा डागाळली होती.

यावर्षीच्या एप्रिल-मे मध्ये परीक्षा वेळपत्रकातील गोंधळाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर अभाविप शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांची भेट घेवून विद्यापीठातील सर्व निकाल वेळेत लावण्याची मागणी केली आहे.

एप्रिल-मे मध्ये परीक्षा पेपरचे असेसमेंट जवळ जवळ संपत आल्याने निकाल येत्या 3-4 दिवसांत लागणे सुरू होईल असे आश्वासन कुलगुरूंनी अभाविपच्या शिष्टमंडळाला आहेत. अशी माहिती प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी प्रसार माध्यमांना दिली. तसेच यावेळी निकालात गोंधळ होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Related posts

आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नाण्यांचे १ दिवसीय अनोखे प्रदर्शन

News Desk

म.रा.पत्रकार संघ तालुका कार्यकारणी घोषीत

News Desk

राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्माक आदेश    

News Desk