HW News Marathi
मुंबई

लागला एकदाचा टीवाय बीकॉमचा ‘निक्काल’!

मुंबई : तब्बल गेल्या दोन महिन्यांपासून चातकासारखे आपल्याच निकालाची वाट पाहणाऱ्या टीवाय बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल अखेर मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. रविवारी रात्री उशिरा टी.वाय.बी.कॉमच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल जाहीर करण्यात आले. पाचव्या सत्राचा निकाल ६०.९२ टक्के, तर सहाव्या सत्राचा निकाल ६५.५६ टक्के लागला आहे. ३१ ऑगस्टची डेडलाइन पाळण्यासाठी आता विद्यापीठाला आणखी ४५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत.

वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर तपासण्यासाठी आता विद्यापीठ अन्य विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा आधार घेत आहे. ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या वाणिज्य शाखेचेच निकाल रखडले होते. विद्यापीठाला आणखी ४१ हजार १०५ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. तर आयडॉलच्या ५८ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. गणेशोत्सवापासून उत्तरपत्रिका तपासणीचा वेग मंदावला आहे. रविवारी ८३ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी हजर होते. त्यांनी ४ हजार ३४५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. यात आयडॉलच्या वाणिज्यच्या २,६८४, तर वाणिज्य नियमित अभ्यासक्रमाच्या १,६२१ उत्तरपत्रिकांची तपासणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मॅनहोल्सच्या झाकणांची चोरी, पालिका हतबल

News Desk

मुंबईतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

swarit

पुण्यात चार वर्षीच्या बालिकेवर बलात्कार

News Desk
कृषी

गुळ क्लस्टरसाठी निधी देऊ – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

News Desk

कोल्हापूर : कोल्हापूरचा गुळ जगप्रसिद्ध असून गुळ क्लस्टरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे बोलताना दिली.

मेक इन कोल्हापूर संकल्पनेंतर्गत सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार संध्यादेवी कुपेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

मेक इन कोल्हापूरसाठी उद्योजकांनी सक्रीय होऊन पुढाकार घ्यावा, शासन खंबीरपणे पाठीशी राहील, अशी स्पष्ट ग्वाही देऊन मुनगंटीवार म्हणाले, मेक इन महाराष्ट्रसाठी मेक इन कोल्हापूर बनविणे आवश्यक आहे. येथील औद्योगिक क्षेत्राला तसेच पर्यटनाला गती देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल. महाराष्ट्राची देशात उत्पादनामध्ये मोठी आघाडी असून महाराष्ट्रात उद्योगाचे स्वत:च क्लस्टर निर्माण केले आहे. राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात असे उद्योग विकसित करुन नव्या पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास करण्याचा ध्यास शासनाने घेतला असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

पर्यटन व्यवसायात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असल्याने राज्यात पर्यटनावर अधिक भर दिला जात आहे. कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी शासन कटिबद्ध असून यासाठीचे प्रस्ताव प्राधान्य क्रमाने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही देऊन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मेक इन कोल्हापूर ही संकल्पना यशस्वी करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या निश्चितपणे केल्या जातील. कोल्हापुरात जैव विविधता संशोधन केंद्राबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. कोल्हापुरच्या गुळाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच गुळासाठीचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी आवश्यक लागणारा‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

Related posts

शेतकरी पुत्राची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

News Desk

माझं मत- तुमच्या शहरातील एटीएममध्ये पैसे आहेत का ?

News Desk