HW News Marathi
मुंबई

लागला एकदाचा टीवाय बीकॉमचा ‘निक्काल’!

मुंबई : तब्बल गेल्या दोन महिन्यांपासून चातकासारखे आपल्याच निकालाची वाट पाहणाऱ्या टीवाय बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल अखेर मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. रविवारी रात्री उशिरा टी.वाय.बी.कॉमच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल जाहीर करण्यात आले. पाचव्या सत्राचा निकाल ६०.९२ टक्के, तर सहाव्या सत्राचा निकाल ६५.५६ टक्के लागला आहे. ३१ ऑगस्टची डेडलाइन पाळण्यासाठी आता विद्यापीठाला आणखी ४५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत.

वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर तपासण्यासाठी आता विद्यापीठ अन्य विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा आधार घेत आहे. ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या वाणिज्य शाखेचेच निकाल रखडले होते. विद्यापीठाला आणखी ४१ हजार १०५ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. तर आयडॉलच्या ५८ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. गणेशोत्सवापासून उत्तरपत्रिका तपासणीचा वेग मंदावला आहे. रविवारी ८३ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी हजर होते. त्यांनी ४ हजार ३४५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. यात आयडॉलच्या वाणिज्यच्या २,६८४, तर वाणिज्य नियमित अभ्यासक्रमाच्या १,६२१ उत्तरपत्रिकांची तपासणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाला जाग

News Desk

एटीटी पार्सलच्या जंगलात खून: सुटकेसमध्ये अढळला मृतदेह

News Desk

काँग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk