HW News Marathi
मुंबई

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

पनवेल | उन्हाळ्यात पनवेल महापालिकेकडून वेळेत नालेसफाई न झाल्यामुळे पावसाला सुरुवात होताच कामोठेकर त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पासून कामोठे सेक्टर १९ मधील नागरिक नाल्याच्या दुर्गंधीमुळे पुरते हैराण झाले आहेत. सेक्टर १९ मधील या नाल्यात पनवेलसह आजू बाजूच्या परिसराचे सांडपाणी सोडले जाते. या नाल्या लगतचं ऐक कचरा पेटी असून नागरिक त्यात ओला, सुका कचरा टाकतात.

या नाल्यातून कचरा सध्या ओव्हरफ्लो झाला असून तो रस्त्यावर पडलेला दिसून येत आहे. तरीही वेळोवेळी कचरा गाडी कचरा उचलायला येत नाही. तरी तिथे नाल्या बरोबरच कचऱ्याची सुद्धा दुर्गंधी नागरिकांना सहन करवी लागते . हा नाला उघडा असल्यासमुळे घाण वास, डास यांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम होत आहे. आरोग्या संदर्भात अनेक समस्यांना तेथील रहिवाशांना सामोरे जावे लगते . रहिवाश्यांनी स्थानिक नगरसेवकाकडे तक्रार करून सुध्दा तेथील रहिवाशांना दुर्गंधी पासून आणि कचरा पासून अद्याप सुटका मिळालेली नाही. एवढ्या समस्या असून नगरसेवक आणि पनवेल महानगरपालिका लक्ष देत नसल्याची तक्रार स्थानिक नागरीक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस

News Desk

सत्तेसाठी लांडगे एकत्र आले, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका

News Desk

शिवाजी पार्कवर रंगला महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

swarit

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही !

swarit

भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत, सामनातून भाजपवर टीका

News Desk