HW News Marathi
मुंबई

माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | देशभरात कथित माओवाद्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथविण्याचा मोठा डाव होता असा गौप्यस्फोट केला आहे. शुक्रवारी मुंबईत पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे. सदर पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालकांनी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्या संदर्भातील विविध पुरावे प्रसार माध्यमांसमोर ठेवले आहेत. यावेळी पोलिसांनी प्राप्त झालेले पुरावे आणि ही कारवाई कशी केली गेली याविषयी माहिती दिली.

देशाविरुद्ध प्रचंड मोठ्या कटाची तयारी करत असल्याचे तपासादरम्यान उघड झाल्याचे त्यांनी सांगितले. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आधारवरूनच त्यांना अटक केल्याची पोलिसांनी स्पष्ट केले. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून वर्णन गोन्सालविस, वरावर राव, अरुण फरेरा, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज यांनी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून प्राप्त झालेले ईमेल, पत्रे, संगणक जप्त करण्यात आले आहेत. संगणकाचे पासवर्डसुद्धा समजले असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेले मुद्देमाल फोरेन्सिक चाचणीसाठी धाडला आहे तर संपूर्ण छापेमारीची व्हिडिओक्लिप देखील आमच्याजवळ असल्याचे त्यांनी सांगितले. सुधा भारद्वाज यांनी कॉम्रेड प्रकाशला लिहिलेले पत्र आणि काही पत्रे देखील त्यांनी वाचून दाखविली. या पाचही जणांचे काम सीपीआयएमच्या सेंट्रल कमिटीस कळवले जायचे. पत्रात राजीव गांधी घातपाताचा सुद्ध उल्लेख असल्याचे उघड झाले. भीमा कोरेगाव प्रकरणी ५ लाख रुपाये पुरविले असल्याचे यामधून उघड झाले. सरकार उलथविण्याचा आणि देशात मोठी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे यादरम्यान उघड झाले. या सर्व प्रकरणात मिलिंद तेलतुंबडे यांचाही समावेश असल्याचे उघड झाले. त्यामुळे हा सर्व माओवाद्यांचाच कट असल्याचे पुराव्यामधून स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फ्लिपकार्टसेवा काही काळासाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

swarit

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat

बेस्ट कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ, संप सुरूच

News Desk
मुंबई

सरकार उलथविण्याचा माओवाद्यांचा होता कट

News Desk

मुंबई| देशभरात कथित माओवाद्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथविण्याचा मोठा डाव होता असा गौप्यस्फोट केला आहे. शुक्रवारी मुंबईत पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे. सदर पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालकांनी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्या संदर्भातील विविध पुरावे प्रसार माध्यमांसमोर ठेवले आहेत.

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नण गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली आहे. ही अटक अत्यंत योग्य होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला, असेही यावेळी बोलताना पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

बंदी असलेल्या नक्षली संस्थांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये हजारो संशयित कागदपत्रे, कंप्युटर्स आणि लॅपटॉप पासवर्डसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

Related posts

इंद्रायणीकाठी विवाहितेसह प्रियकराने संपविले जीवन

News Desk

अजमेरा बिल्डरला ५०० कोटीचा फायदा केल्याचा BMC वर आरोप; भाजप आमदरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Aprna

बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेची दिवाळी भेट

News Desk