HW News Marathi
मुंबई

राज्यातील संगणक परिचालकांचे उपोषण स्थगित

जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील प्रश्न सुटले;आठ दिवसात मंत्रालयात होणार बैठक

बैठकीत टास्क कन्फर्मेशन रद्द न केल्यास १ नोव्हेंबर ला मंत्रालयावर मोर्चा काढणार –सिद्धेश्वर मुंडे

मुंबई

राज्यातील संगणक परिचालकांच्या विविध मागण्यासाठी १२ ऑक्टोबर पासून सुरु केलेले बेमुदत आमरण उपोषण राज्यशासनाचे ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी मंत्रालयात बैठक घेऊन टास्क कन्फर्मेशन मध्ये मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद स्तरावरील मागण्या सोडविल्यामुळे आमरण उपोषण १८ ऑक्टोबर रोजी स्थगित करण्यात आले .

संग्राम प्रकल्पातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्रा मध्ये सामावून घेणे, ज्या मुळे मानधन कपात मोठ्या प्रमाणात होत आहे ते टास्क कन्फर्मेशन रद्द करणे ,ई-ग्राम सोफ्टवेअर बदलून देणे ,थकीत मानधन देणे यासह विविध मागण्यासाठी १२ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. ७ व्या दिवशी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे,ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी मध्यस्ती करून येत्या १० दिवसात टास्क कन्फर्मेशन बाबत मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल असे सांगितले ,तसेच राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्राच्या संख्येत वाढ केले,मागील जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ च्या मानधनाबाबत संबंधित मानधन तत्काळ अदा करणेचे लेखी आदेश दिले ,एप्रिल ते जून या कालावधीतील मानधन दिवाळीच्या एक दिवस अगोदर ऑपरेटर च्या खात्यात वर्ग केले परंतु टास्क कन्फर्मेशन च्या नावाखाली कपात होत असल्यामुळे शासनाने यावर निर्णय घेण्याची मागणी संघटनेने लाऊन धरली होती त्यात मार्ग काढण्याचे आश्वासन ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी दिले आहे ,तरीही २५ सप्टेंबर २०१७ पासूनचे कामबंद आंदोलन सुरुच राहणार असून जर होणाऱ्या बैठकीत मार्ग नाही निघाला तर ०१ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस, सखल भागात साचले पाणी

News Desk

भांडुप उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरची धडक 

swarit

उंदरासाठी १३० कोटीचं घर 

News Desk