HW News Marathi
मुंबई

…मात्र राज्य सरकार गप्प का ? संजय राऊतांचा रोखठोक सवाल

मुंबई | बेळगाव आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. कर्नाटकाकडून सतत्याने सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. त्यातच आता कर्नाटक सरकारने भाषिक जनगणना केली आणि त्यात मराठी भाषिकांची संख्या कमी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. बेळगावात केवळ 15 टक्के इतकेच मराठी भाषिक असल्याचा दावा कर्नाटक सरकारने या जनगणनेनंतर काढला आहे. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांची संख्या लपवत कमी दाखवली असल्याचा संशय

बेळगावात साधारणत: 60 टक्के मराठी भाषिक राहत असल्याचा अंदाज आहे. मात्र, कर्नाटक सरकारने केलेल्या जनगणनेत केवळ 15 टक्के मराठी भाषिक हे बेळगावात राहतात. 15 टक्क्यांहून संख्या असल्यास तर अल्पसंख्यांक भाषिकांना देण्यात येणाऱ्या त्यांच्या मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा बंद करण्याची शक्यता असते. त्यामुळे मराठीतून कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याची बंधने सरकारवर नसतील. त्यामुळे मराठी भाषिकांना कानडीतूनच सर्व बाबींची पुरतरता करावी लागेल. याच उद्देशाने कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांची संख्या लपवत कमी दाखवली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

संजय राऊत म्हणाले, बेळगाव आणि मराठी माणसाच्या मुद्दावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारची कानउघडणी केली आहे. यामध्ये काही तरी डाव आहे. हा रिपोर्ट पूर्णपणे खोटा आहे आणि त्याचा निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने यावर भूमिका घ्यायला हवी. राज्य सरकार यासंदर्भात का गप्प बसले आहेत मला कळथ नाही. राज्य सरकारने सीमाभागासाठी दोन मंत्री समन्वयक नेमले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला यंदा ४० किलो सोन्याचे दागिने!

News Desk

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna

लोकलचे चाक रुळावरुन घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk