HW News Marathi
मुंबई

गणेशोत्सवाचं भक्तांचा उत्साह शिगेला

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून ज्याच्या आगमनाची वाट अवघा महाराष्ट्र पाहात होता, त्या गणेशाचे आगमन अखेर शुक्रवारी झाले. अधूनमधून कोसळणाऱ्या रिमझिम सरी, ढोल ताशाच्या गरजात सुरू असलेला बाप्पा मोरयाचा जयघोष आणि उदंडउत्साह याने राज्यभर अनोखे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई- पुण्यातील रस्ते तर गणेशाच्या आगमनासाठी गर्दीने फुलून गेले आहेत. घरगुती गणेशांसोबतच सार्वजनिक गणेशमंडपांमध्येही मोठी लगबग सुरू आहे. त्यातच न्यायालयाने ध्वनिक्षेपकांवरील आवाजाच्या मर्यादा शिथिल केल्यामुळे जागोजागगणेशाच्या गाण्याचे स्वर घुमत आहेत. पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना नुकतीच झाली आहे. तर दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचीही प्राण प्रतिष्ठापना लवकरच होत आहे. मुंबईतील लालबागचा राजा, गणशेगल्ली येथील गणपतींचा प्रतिष्ठापनाही दुपारपर्यंत सुरू होती. प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात आरतीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुपारपर्यंत करा स्थापना श्रीगणेशाची स्थापना व पूजन करण्यासाठी आज प्रात:कालपासून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभवेळ असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच, यावर्षी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मंगळवारी होत असले, तरीही ते त्याच दिवशी करावे. गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि मंगळवारचा काहीही संबंध नाही, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईतील सभेत ओवैसींवर चप्पल फेकली

News Desk

अमित शहा उद्धव ठाकरे यांना भेटणार नाहीत – आशिष शेलार

News Desk

मनसे फेरीवाल्यांविरोधात पुन्हा आक्रमक, २० मार्चला फेरीवाल्याविरोधात आंदोलन

News Desk
देश / विदेश

आधार’ सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निराधार’

News Desk

नवी दिल्ली : लोकशाहीत व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्यावर घाला घालणाऱ्या कोणत्याही योजना किंवा उपक्रम शासनाला राबविता येणार नाहीत, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. या निकालामुळे केंद्र शासनाची आधार ही महत्त्वाकांक्षी योजना निराधार होण्याची शक्यता आहे.

विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी केंद्राकडून हळूहळू आधार सक्ती करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल म्हणजे केंद्राला जोरदार धक्का असल्याचे मानले जात आहे. आधार सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो, असा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर गेले आठ दिवस सुनावणी सुरू होती.

Related posts

उत्तर प्रदेशात महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय क्रांतीकारीच !: नाना पटोले

News Desk

एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला, ४५ लाख प्रवाशांची क्रेडिट कार्डसह महत्त्वाची माहिती ‘लीक’

News Desk

सर न्यायाधीशांविरोद्धात महाभियोगचा प्रस्ताव व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला

News Desk