HW News Marathi
मुंबई राजकारण

वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार! – आदित्य ठाकरे 

मुंबई | “वरळीत त्यांना गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे, तरी विजय आपलाच होणार आहे”, असा टोला शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला. वरळीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज (7 फेब्रुवारी) सभा होणार आहे. “वरळीतून लढणं जमत नव्हतं तर मला फोन करुन सांगायचं, मी ठाण्यात येऊन लढलो असतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी संवाद  यात्रेदरम्यान नाशिकच्या चांदोरी येथे आयोजित सभेत केली आहे आहे.

 

मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांशी जाता येत नाही. बुरा वक्त आया है, वो भी जायेगा. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा खोके वाटले जातात पण तरीही खुर्च्या रिकाम्या असतात. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा क्सिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात. दुःख याचं नाही की उद्योग बाहेर गेले; पण राजकीय अस्थिरत्यामुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. आशीर्वाद तुम्ही मला द्या. गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता बोलता तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल; पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून तीन दिवस बॅंका बंद असणार

swarit

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

News Desk

पर्यावरणपूरक उपक्रमाने प्लास्टिक बंदीचे स्वागत

News Desk