HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या दारात आत्महत्येची पाळी का येते? धक्कादायक.. मंत्रालयात आणखी एक आत्महत्या…

हर्षलनं आत्महत्येचा प्रयत्न केला की तो, इमारतीवरून खाली पडला याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे, हर्षलनं आत्महत्येचा प्रयत्न केला नाही तर तो इमारतीवरून खाली पडला असा दावा सरकारनं केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हर्षल याला प्रत्यक्षदर्शींनी केवळ खाली पडताना पाहिलंय.
  • मेहुणीच्या खुनाचा आरोप
मेहुणीच्या खून प्रकरणी हर्षलला शिक्षा झाली होती. पैठणच्या तुरुंगात तो चार-पाच वर्षांपासून शिक्षा भोगत होता. सध्या तो पॅरोलवर बाहेर होता. परंतु, हर्षलची तुरुंगातील वर्तवणूक चांगली होती, अशीही माहिती हाती येतेय.
  • सरकार अडचणीत?
काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या धर्मा पाटील या शेतकऱ्यांनं मंत्रालयातच विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घटना घडली होती. त्यानंतर मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या आणखी एका शेतकऱ्याजवळ पोलिसांना विषाची बाटली आढळली होती. शिवाय, कालच एका उच्च शिक्षित तरुणानं मंत्रालयासमोर पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
  • मुख्यमंत्र्यांच्या दारात आत्महत्येची पाळी का येते?

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दारात येऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी का येते, याचा विचार व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रश्नावर सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करून यावर काय भूमिका घ्यायची याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही चव्हाण म्हणाले.

  • सरकारच्या उदासिनतेमुळे आत्महत्यांचा प्रयत्न

सरकारच्या उदासिनतेमुळेच शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

या घटनेचे वृत्त कळताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील मंत्रालयात पोहोचले.

धर्मा पाटील प्रकरणानंतर मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची अलिकडची ही तिसरी घटना आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुलगुरूंना हटवताना राज्यपाल दबावाखाली होते का-मुणगेकर यांचा सवाल

News Desk

आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर

swarit

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, २ अभियंत्यांना अटक

News Desk