HW News Marathi
मुंबई

पालक–पनीरमध्ये मेलेली पाल; ५ जणांची प्रकृती बिघडली

मुंबई – मेलेली पाल पडलेले पालक -पनीर खाल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांची प्रकृती बिघडल्याची खळबळजनक घटना पश्चिम उपनगरातील कांदिवली पूर्व भागात घडली आहे. या सर्वांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खोंडोबाई बनसोडे ( 59), सुरेखा साळवी (27), दिलीप (35) व सम्यक बनसोडे (4) आणि विवान साळवी (1) अशी या पाच जणांची नावे असून आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.

राजेंद्र बनसोडे यांच्या वडिलांचे 7 ऑगस्ट रोजी निधन झाले होते, यानंतर सर्व नातेवाईक त्यांच्याच घरात राहात होते. त्यांची बहिणी सुरेखा आणि वहिनी अस्मिता यांनी केलेला स्वयंपाक पहिल्या पंगतीत बसून या पाच जणांनी खाल्ला. या वेळीजेवताना सुरेखाला ताटात पाल दिसली. तिने सर्वांना याबाबत सांगितले. मात्र तोपर्यंत या पाचही जणांच्या पोटात हे अन्न गेले असल्याने त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बालमोहन शाळेची गुरुपौर्णिमा 

swarit

रेल्वेचे ट्रॅकमन करतायत अधिकाऱ्यांची सेवा!

News Desk

कंत्राटदारांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

swarit