HW News Marathi
मुंबई

श्रीदेवींचे पार्थिव आज दुबईहून मुंबईत दाखल होणार

मुंबई | अभिजात सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘चांदणी’ श्रीदेवी निखळल्याने सर्व सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत कार्डिअॅक अरेस्टने बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्या अवघ्या 54 वर्षांच्या होत्या.

श्रीदेवींचे पार्थिव सकाळी ११ वाजेपर्यंत दुबईहून मुंबईला आणण्यात येणार आहे. शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणी अहवालावर दुबईत होत असलेली कायदेशीर प्रक्रिया रविवारी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी यांचे चार्टर्ड प्लेन दुबईला रवाना झाले आहे. 13सीट्सचे हे खासगी चार्टर्ड प्लेन आहे.

मुंबईतील वर्सोवा येथील भाग्य बंगल्यात श्रीदेवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझमध्ये अंत्यसंस्कार होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार संजय राऊत यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल

News Desk

इतिहासाची माहिती व्हावी यासाठी चिमुकल्याची ऐतिहासिक वेशभूषा

News Desk

माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk