HW News Marathi
देश / विदेश

… तर फटाक्यांची माळच लागेल !, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत राज ठाकरेंचा इशारा

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रातील आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. भाजप एकीकडे याच पार्श्वभूमीवर आज (२१ मार्च) राज्यव्यापी आंदोल करत आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचबाबत पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी, सचिन वाझे संबंध त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत परखड भूमिका मांडत या संपूर्ण प्रकरणाची केंद्र सरकारकडून चौकशी व्हावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. “सचिन वाझे हा मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचा माणूस आहे. त्यामुळे, केंद्र सरकरकडून या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली तर ‘फटाक्यांची माळ लागेल”, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.

नेमके काय म्हणाले राज ठाकरे ?

* परमबीरसिंह यांचे पत्र अत्यंत धक्कादायक आहे. राज्याच्या-देशाच्या इतिहासात असे कधीही घडले नाही.

* १०० कोटी एकट्या मुंबईतून मागितले. गृहमंत्री राज्याचे असतात. असे आणखी किती शहरांसाठी, किती टार्गेट देण्यात आले ? हा पण महत्त्वाचा प्रश्न

* संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. गृहमंत्री अनिल देशमुखांचीही कसून चौकशी झाली पाहिजे.

* परमबीरसिंह यांना पदावरून का काढले ? याबाबत राज्य सरकारकडून अद्याप स्पष्टीकरण नाही.

* या प्रकरणात परमबीरसिंह यांचा आक्षेपार्ह सहभाग असेल तर बदली का केली ? अद्याप चौकशी का केली नाही?

* मुख्य मुद्दा हा की मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीन कोणी ठेवले ? ह्या प्रश्नाला बगल मिळता कामा नये

* शिवसेना प्रवेशासाठी वाझेंना कोणी नेले होते ? पुन्हा वाझेंना पोलीस दलात कोणी आणले ?

* सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे.

* मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्र्यांचेही अत्यंत मधुर संबंध, जे सर्वश्रुत आहेत.

* मोठ्या कोणा व्यक्तीचे आदेश असल्याशिवाय पोलीस हे धाडस करूच शकणार नाहीत. कोणाचे आदेश होते ?

* या प्रकरणाची सखोल चौकशी महाराष्ट्रात होणार नाही म्हणून चौकशीसाठी माझी केंद्राकडे विनंती.

* या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली तर ‘फटाक्यांची माळ लागेल.’

* धमकी देणारा माणूस इतकं आदराने कसा बोलतो?

* अनिल देशमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा, कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा.

* कोण कोण ह्यात आत जातील ह्याची कल्पनाही करता येत नाही.

* लाज वाटली मला की उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्राचा गृहमंत्री सांगतो बारमध्ये जाऊन पैसा गोळा करा

* पोलीस बॉम्ब ठेवतात, ठेवायला सांगितले जाते ही घटना क्षुल्लक नाही

* केंद्राला हात जोडून विनंती, ह्यात हस्तक्षेप करा, चौकशी करा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधींच्या मतदार संघातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी अर्ज

News Desk

राज्यसभेसाठी नोटाचा वापर करता येणार

News Desk

फटाका फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये मोठा स्फोट, ७ जणांचा मृत्यू

swarit