HW News Marathi
मुंबई

धोबी तलाव मधील एस एस गायकवाड रोड प्रकाशझोत

मुंबई | गेली अनेक वर्षे एस एस गायकवाड रोड वर बेस्ट पोलवर साधे दिवे लावले होती. त्यामुळे खूपच प्रकाश कमी पडत होता. यामुळे स्थानिक रहिवाशी यांना खूप नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. येथे गेले ४ दिवस लाईट नव्हती म्हणून येथील स्थानिक नागरिकांनी तक्रार स्थानिक भाजप नगरसेविका रिटा मकवाना यांना दिली असता त्यांनी तात्काळ पाहणी करत त्वरित बेस्ट कर्मचारी यांना बोलवून त्वरित येस येस रोड वर एल ई डी लाईट बसवून घेतल्या आहेत.

गेली अनेक वर्षे आम्ही जुन्या लाईट दिव्यांच्या प्रकाशात होतो. पण या नगरसेविकाने धोबी तलावमध्ये खूप कामे केली आहेत. कोणही तक्रार केली असता त्वरित त्या स्थळी भेट देऊन त्या कामाचे निरसन करतात. धोबी तलाव रहिवाशी यांच्या सदैव पाठीशी असतात,असा विश्वास नागरिकांनी दर्शवला आहे. एस एस गायकवाड रोड वर एल ई डी वीज लावून घेतल्याबद्दल नागरिकांना रिटा मकवाना यांचे आभार मानले.

मी “सी वॉर्ड” ची प्रतिनिधी आहे सदैव त्यांच्या पाठीशी असणे मी माझे कर्तव्य समजते. कोणतेही काम असुदे ते प्रामाणिक करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि सदैव मी करत राहणार.एल इ डी लावून दिल्यामुळे नागरिकांनी माझे आभार मानले. अशी प्रतिक्रिया स्थानिक भाजप नगरसेविका रिटा मकवाना यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पीडितांना मिळणार तात्पुरता निवारा

News Desk

ओमी कालानीचा भाजपा प्रवेश धमाका ठरणार की फुसका बार?

News Desk

सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील

swarit
मुंबई

मुंबईत वरुणराजाची हजेरी

News Desk

मुंबई | गरमीने हैरान झालेल्या मुंबईकरांना बुधवारी काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबईत दादर, प्रभादेवी, परळसह गिरणगावात अन्य काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. गेलया दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण मुंबईत पहायला मिळत होते त्यातच उकाडा अधिक वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने त्रस्त होते. बुधवारी वरुण राज्याने लावलेल्या हजरेमुळे मुंबईकर काही प्रमाणात नक्कीच आनंदी झालेले आहेत.

पावसाच्या अगदी हलक्या सरी बरसल्या असल्या तरीही सकाळपासूनच सर्वत्र वातावर ढगाळ आहे. घरासमोर, रस्त्यावर पाणी शिंपडावे अशा स्वरुपाचा हा पाऊस असला तरी मुंबईकर मात्र नक्कीच सुखावलेले पहायला मिळत आहेत.

Related posts

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat

झोमॅटोवर मिठाई खरेदी करणं पडल महागात; २ लाख ४० हजार ३१० रुपयांची ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार समोर

Chetan Kirdat

महापालिकेचे अजब तर्कट, त्या निवेदिकेचा मृत्यू वाऱ्यामुळे

News Desk