HW News Marathi
मुंबई

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

मुंबई | धारावी पुनर्विकास प्रकल्पाच भागीदारीत करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून काल (मंगळवार) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पुनर्विकास प्रकल्पात मुख्य कंपनी ८० टक्के गुंतवणूक करणार असून राज्य सरकारचे २० टक्के समभाग असलेली विशेष कंपनी (एसपीव्ही) अशी भागीदारी करून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. हा प्रकल्पासाठी २६ हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपये इतका वाटा उचलणार असल्याची मान्यता दिली आहे.

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी २००७ ते २०११ तसेच २०१६ मध्ये दोन वेळा जागतिक निविदा काढण्यात आल्या होत्या. तर पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यावेळी गुंतवणूकदारांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास फारसा रस दाखवला नव्हता. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता या पुनर्विकास प्रकल्पासाठी पुन्हा एकदा जागतिक निविदा काढली जाणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पानुसार पाच कोटी चौरस फूट एवढी विक्रीयोग्य जागा मिळणार आहे.

धारावीच्या या पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. या मोठ्या प्रकल्पात गुंतवणूकदारांनी या प्रकल्पात गुंतवणूक करावी यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने या प्रकल्पात थेट सहभाग घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बाबीचा विचार करून हा भागीदारीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

News Desk

गणेशोत्सव मंडळांना दिलासा, मंडपांसाठी मुदतवाढ

News Desk

मंत्र्यांच्या बंगल्या बाहेर काळे कंदील

News Desk
देश / विदेश

रद्द केलेल्या तिकीटमधून रेल्वेची १४०० कोटींची बेगमी

News Desk

नवी दिल्ली : रेल्वेचे आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठीचे शुल्क वाढविल्याचा रेल्वेला चांगलाच फायदा झाला आहे. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांच्या शुल्कातून रेल्वेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल १४०० कोटी रुपयांची बेगमी केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण करण्याबरोबरच आरक्षण रद्द करणेही रेल्वेच्या पथ्यावर पडत आहे.

तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कामध्ये रेल्वेने नोव्हेंबर २०१५ मध्ये दुप्पट वाढ केली. त्यामुळे वर्षभरात १४00 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहीती रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेत दिली. नोव्हेंबर २०१५ पासून प्रवाशाने एसी ३ टियरचे तिकीट ४८ तासआधी रद्द केल्यास १८० रुपयांचे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. त्याआधी ही रक्कम केवळ ९० रुपये होते. याच पद्धतीने एसी २

टियरचे तिकिट रद्द केल्यास १०० रुपयांऐवजी २०० रुपये शुल्क आकारणे सुरू झाले. तसेच स्लीपर क्लासमधील कन्फर्म तिकिट रद्द केल्याबद्दल प्रवाशांकडून ६०रुपयांऐवजी १२० रुपये आकारणे सुरू केले आहे आणि सेकंड क्लासचे तिकिट केल्यास त्यासाठी ३० ऐवजी ६०रुपये शुल्कआकारणी सुरू केली आहे.

याशिवाय प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास रेल्वे त्या आसनावर अन्य प्रवाशांची व्यवस्था करतेच. त्यामुळे तिथेही पैसा मिळतो. त्यापैकी अनेक तिकिटे तत्काळद्वारे घ्यावी लागतात आणि अर्थातच त्यासाठी प्रवाशांना जादा पैसा मोजावा लागतो. यासर्व गोष्टींमुळे रेल्वेचा महसूल वाढत आहे.

Related posts

“फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या ५ वर्षे अगोदरच झालं” पडळकरांची थोरातांवर शेलक्या शब्दांत टीका

News Desk

काँग्रेस सरकारच्या काळात तुरुंगात असताना माझा प्रचंड छळ झाला !

News Desk

पुन्हा दरवाढ ; पेट्रोल, डिझेल महागले

News Desk