HW News Marathi
मुंबई

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा पाठिंबा

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये आरटीओच्या ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची’ भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परंतु उच्च न्यायालयात प्रकरण गेल्याने न्यायालयाने या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. आपल्याला नोकरीत सामावून घ्यावे यासाठी या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला अभाविप शिष्टमंडळाने भेट देत त्यांचा पाठिंबा दर्शविला आहे.

उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना सेवेत सामावून घ्यावे, गरज पडल्यास शासनाने सर्वोच्च न्यायालयात जावे अशा मागण्या यावेळी प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सरकारकडे केल्या आहेत. तसेच या सर्व प्रकरणात अभाविप आपल्यासोबत असेल मत यावेळी ओव्हाळ यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे याचा सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

प्रथमच या भरती प्रक्रियेत अधिक विद्यार्थी/युवकांना सामावून घेण्यासाठी शासनाने भरती प्रक्रियेत काही बदल केले. याच धर्तीवर ८३२ उमेदवारांची निवडही झाली. परंतु न्यायालयात प्रकरण गेल्यावर परिवहन विभागातर्फे त्यावर ठोस भूमिका घेतली नाही. त्याचा परिणाम होतकरू, मेहनती ८३२ विद्यार्थ्यांवर झाला. यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पोलीसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

पर्यावरणपूरक उपक्रमाने प्लास्टिक बंदीचे स्वागत

News Desk

22 वर्षीय मुलीला आईनेच ढकलेल वेश्याव्यवसायात

News Desk
देश / विदेश

पीएनबीच्या घोटाळ्यातील आरोपींना अटक

News Desk

पीएनबी घोटाळ्यातील आरोपीना अटक करण्यास सीबीआयने सुरूवात केली आहे आज पहिली कारवाई केली आहे.आज पीएनबी बॅकेचे उपाध्यक्ष आणि नीरव मोदी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी गोपाळनाथ शेट्टी या दोघांना सीबीआयने मुंबईतून आटक केली आहे.

नीरव मोदीला लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवून देण्यात गोपाळनाथ शेट्टी यांचा मोठा हात होता. संपुर्ण घोटाळा 11.300 कोटींची आहे. हा घोटाळा मोदी सकरकाच्या सत्तेतच झाल्याचा स्पष्ट सीबीआयच्या एफआयरवरून झाला आहे.

Related posts

सरकारी बँकांचे खासगीकरण होणार, पंतप्रधानांचे संकेत

News Desk

Gujarat Election Result Live Updates : दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान मोदी सायं. 6 वा. जाणार; कार्यकर्त्यांना संबोधित करणार

Aprna

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक 

News Desk