HW News Marathi
मुंबई

गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची मार्गाची वाहतूक बुधवारी (२२ मे) सकाळी विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव स्थानकावर बुधवारी (२२ मे) झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरीही लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. कामाला जाण्याच्या आणि ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या गैरसोयीमुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत.

गोरेगाव स्थानकाजवळ बुधवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, आता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरीही पश्चिम रेल्वेची वाहतूक अद्याप १५ ते २० मिनिटे उशिरानेच सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनोज मेहता यांचा मृत्यू, अंधेरी पुल दुर्घटनेत झाले होते जखमी

News Desk

भिडेंना अटक करा, आठवले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

ठाण्यात ट्रॅक ओलांडताना एकाचा मृत्यू

swarit
Uncategorized

राहुल गांधीं बरोबर हात मिळवणी सर्वांसमोर करेन !

News Desk

अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर हातमिळवणी करायची असेल तर ती सर्वांच्या समोर करेन असे सांगत राहुल गांधी बरोबर गुप्त बैठक झाल्याचे वृत्त पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल याने फेटाळून लावले आहे. एका खाजगी वृत्तवाहीनीने हार्दीक आणि राहुल यांची भेट झाल्याचे वृत्त दाखवले होते. शिवाय राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हार्दिक आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. त्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती.

हार्दीक पटेल यांना पाटीदार समाजाचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या प्रत्येक हालचालांवर सरकार आणि भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. हार्दिकचा पाठींबा मिळवण्यासाठी काँग्रेससह भाजपचे नेतेही प्रयत्नात आहेत. मात्र हार्दिक आणि त्याच्या सहकार्यांचा कल हा सध्या तरी काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट आहे. त्यातूनच राहुल आणि हार्दिकच्या भेटीचे वृत्त समोर आले आहे. शिवाय राहुल गांधी बरोबर हात मिळवणी करायची असेल तर ती सर्वां समोर करेन हे हार्दिक यांचे वक्तव्य सर्व काही सांगून जाते.

Related posts

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

Aprna

Aprna