HW News Marathi
मुंबई

ठाणे, कल्याण उपनगरांचा मुंबईशी संपर्क तुटला

मुंबई-मुसळधार पावसाने मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. लोकल ट्रेनवरही याचा परिणाम झाला. वांद्रे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे खोळंबली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, येत्या 24तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार,अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

दक्षिण मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर प्रचंड आहे. त्यात वारा सुटल्याने मुंबईकरांची दैना झाली. बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहीम,दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, कुलाबा,भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर,विक्रोळी आणि मुलुंड येथे पावसाने धुमाकूळ घातला. दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे. पावसामुळे भायखळा,लालबाग, परळ, माटुंगा आणि सायन येथे वाहतुकीचा वेग मंदावला. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमागृह, कमानी आणि घाटकोपर येथील श्रेयस टॉकीज येथील वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्या परिसरातील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी पशुपालकांसाठी लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना

Aprna

Breaking News | सीबीआयला सत्र न्यायालयाचा धक्का

News Desk

कोरोना काळात नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा! – सुधीर मुनगंटीवार

Aprna