HW News Marathi
मुंबई

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले होते. ५८ मूक मोर्चे काढले. अनेक ठिय्या आंदोलन केली. तरी सरकारला जाग आली नाही. आंदोलन करुन देखील आरक्षण मिळत नाहीत. त्यामुळे ३१ सप्टेंबर रोजी पक्षाची स्थापना करणार असल्याचे मराठा क्रांती संघटनेचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाच्या २५ ते २६ संघटनांना एकत्रित घेऊन पक्षाची स्थापना करणार आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागांवर आमचे उमेदवार असतील. प्रतापगडावर पक्षाचे नाव, ध्येय धोरण, सूचना देण्यात येईल.

या पक्षामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा हात नसेल आणि कोणत्याही पक्षाची भेट घेणार नाही. आज पर्यंत सर्व पक्षाने आमची मराठा समाजाची फसवणूक केली आहे. तसेच धनगर आरक्षण, मुस्लिम, विषमता दूर करण़्यासाठी पक्षाची स्थापना आम्ही करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आज वरळी बंदची हाक

Aprna

मनसेच्या ६ नगरसेवकांची घरवापसी, शिवसेनेनं मनसेला पाडलं खिंडार

News Desk

मुंबईच्या समुद्रात तीन मुले बुडाली

News Desk
देश / विदेश

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

News Desk

बंगळुरू- प्रचंड पैसा टाकून तसेच देशातील विविध माध्यमांच्या मालकांना हाताशी धरून भाजपने कॉँग्रेसमुक्त भारतचा विडा हाती घेतला आहे. परंतु भाजपच्या या प्रयत्नांना धक्का देणारे वृत्त कर्नाटकमधून हाती येत आहे. येथे आज निवडणुका झाल्यास कॉँग्रेस विजयी होईल, असा अंदाज सी फोर या संस्थेने व्यक्त केला आहे. हा अंदाज देशासाठी नसून केवळ कर्नाटक राज्यासाठी आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना बहुमत मिळणे कठीण जाणार असल्याचे सी फोरने म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सूरू केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचे सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आले आहे. दरम्यान, दक्षिणेत झेंडा रोवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहा यांनी दौरा निश्चित केला होता परंतु हा सर्वे आल्यानंतर त्यांनी तीन वेळा कर्नाटकचा दौरा रद्द केला आहे.

Related posts

इंडोनेशियात भूकंप आणि त्‍सुनामीमुळे हाहाकार

News Desk

देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ | अजित पवार

News Desk

Live Update : पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान भारतीय सैन्याने पाडले

News Desk