HW News Marathi
मुंबई

बेस्टकडे पैसेच नाही तर बोनस देणार कुठून !

मुंबई । “बेस्टकडे पैसेच नाही तर बोनस देणार कुठून? बेस्टकडे पैसे छापण्याची मशीन आहे का”, असा खोचक सवाल महाव्यवस्थापकांनी बेस्ट कर्मचाऱ्यांवर उपस्थित केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या बेस्ट समिती सदस्यांकडून आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. बोनसबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या (३नोव्हेबर) पुन्हा बेस्ट समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

बोनस न झाल्यास कर्मचारी ऐन दिवाळीच्या दिवशी सोमवारपासून आंदोलन करतील, असा इशारा कामगार नेते व बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी दिला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. परंतु बेस्टच्या ४१ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी या वर्षी ही अंधारातच आहे. गेले काही दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत बेस्ट समितीकडून मागणी केली जात आहे.परंतु बेस्ट उपक्रमाकडे पैसाच नसल्याने यंदा बोनस देणे शक्य नाही, असे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी व्यक्त केले आहे. परंतु महापालिकेला कर्जापोटी उर्वरित २२ कोटी रुपये रक्कम न देता बोनससाठी वळवावी,अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बेस्टच्या संपावर आज देखील निर्णय नाहीच, उद्या होणार पुढील सुनावणी

News Desk

गोविंदा रे गोपाळा…..

News Desk

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी! – मुख्यमंत्री

Aprna
देश / विदेश

कश्मीरमध्ये भाजपच्या सचिवाची गोळ्या झाडून हत्या

swarit

जम्मू कश्मीर | किश्तवाडमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव अनिल परिहार आणि त्यांचे भाऊ अजित परिहार या दोघांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारीत अनिल परिहार त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी त्यांचा भाऊ अजित परिहार हे सुद्धा उपस्थित होते. दहशतवाद्यांनी अजित त्यांना देखील गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे संपुर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

 

हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हत्येचा तपास सुरू केला. अजून हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. राज्याचे भाजप महासचिव अशोक कौल यांनी या वृत्ताला दुजोर देत दहशतवाद्यांनी दोन भाजप कार्यकर्त्यांची हत्या केल्याचे म्हटले आहे.

Related posts

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका 

News Desk

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली

News Desk

तुम्हाला जर बलात्कार थांबवता येत नाही, तेव्हा झोपा आणि मजा करा! – काँग्रेस आमदारांचे आक्षेपार्ह वक्तव्य

News Desk