HW News Marathi
मुंबई

कपाडिया नगर परिसरातील पुलाचा भाग कोसळला

मुंबई | मुंबईतील कुर्ला परिसरात चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू असताना अर्ध बांधकाम झालेल्या पुलाचा काही भाग कोसळला. कुर्ल्याच्या कपाडिया नगर जवळील लोखंडी गजाचा मोठा खांब दुपारी एक वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीवर कोसळला.

मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. फक्त रस्त्यावरून जात असलेल्या गाडीचं नुकसान झालं. हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. आज शुक्रवार असल्यानं बहुतांश दुकानदार आणि कामगार नमाजासाठी गेले होते. परिणामी रस्त्यावर वाहनांची संख्याही कमी असल्यानं मोठी दुर्घटना टळली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुळा नदीचे पाणी झोपडपट्टीत शिरले; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

News Desk

किरीट सोमय्यांचा महाविकासविकास आघाडीच्या मंत्र्यांना इशारा!

News Desk

मुंबईला पुन्हा हाय अलर्टचा इशारा

News Desk
राजकारण

‘मीटू’ मोहिमेच्या तक्रारीनंतर लवकरच कायदेतज्ज्ञाची समिती

swarit

नवी दिल्ली | मीटू #MeToo मोहिमेद्वार आपल्यावरील झालेल्या लैंगिक अत्याचाराचे कथन समाजापुढे मांडणाऱ्या सर्व घटनांची तपासणीसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून लवकरच समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत कायदेतज्ज्ञांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

‘मीटू मोहिमेतून लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेवर माझा विश्वास आहे,’ असे महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हटले आहे. या सर्व महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गांधी यांनी माहिती दिली आहे.

‘मीटू’ साठी समितीची स्थापना

सध्या सोशल मीडियावर मीटू चळवळीने संपुर्ण देश हादरवून टाकला आहे. या मोहिमेतून ज्या महिलांनी त्यांच्यावरील झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली आहे. या मोहिमेतून दररोज नामांवत व्यक्तींची नावे समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकार चार सदस्यांची नेमणूक करणार आहे. यामध्ये चार निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असेल. या समितीकडून मी टू चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या तक्रारींवर सुनावणी होईल.

Related posts

प्रांतीय अस्मितेचे जनक बाळासाहेब ठाकरेच !

News Desk

आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही! – शरद पवार

Aprna

नरेंद्र मोदींचे पंतप्रधान पद जाणार !

Gauri Tilekar