HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांनी भिडे यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला…

मुंबई | भिमा-कोरेगाव घटनेसंदर्भात मिलिंद एकबोटे यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यात सरकारचे कोणतेही श्रेय नाही. पण आता एकबोटे यांच्याप्रमाणेच भिडे यांच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला यावरचर्चा करण्याची मागणी केली. मात्र चर्चा नाहीचहा स्थगन प्रस्तावच सभापतींनीफेटाळून लावला.

दरम्यान विधानपरिषदेमध्ये नियम ९७ अन्वये मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावप्रकरणी निवेदन केले होते. या निवेदनात तक्रार दाखल असलेले संभाजी भिडे यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. मुख्यमंत्र्यांनी संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्या नावाचा उल्लेख टाळला असा आरोपही यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानपरिषदेत केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

News Desk

आमदारांनाच गुंडाकडून धमकी – सुनिल प्रभू

swarit

Independence Day | स्वातंत्र दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई

News Desk
देश / विदेश

मोहम्मद शमीने केले धक्कादायक खुलासे !

News Desk

पत्नी हसीन जहाँच्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शमीला हसीन जहाँच्या पहिल्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, हसीन जहाँचे आधीच लग्न झालेले असून पहिल्या नवऱ्यापासून तिला दोन मुली आहेत याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती.

त्यानंतर लग्नानंतरही याची माहिती आपल्याला देण्यात आली नाही. नंतर ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न होऊ लागला. आपल्या दोन्ही मुलींची माहितीही लपवण्याचा प्रयत्न हसीन जहाँने केला. दोन्ही मुली आपल्या बहिणीच्या आहेत जिचा मृत्यू झाला आहे असे मला सांगण्यात आले. आपण दोन्ही मुलींची खूप मदत केल्याचे शमीने यावेळी सांगितले. आपण त्यांना फिरायला घेऊन जायचो, कपडे खरेदी करुन द्यायचो अशी माहिती शमीने दिली आहे.

Related posts

बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून अभिवादन

News Desk

मोठी बातमी! भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

News Desk

सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यावेळी जिवंतच होते

News Desk