HW News Marathi
मुंबई

‘साई संस्थेचा’ प्लास्टिक बंदीला मोलाचा हातभार

मुंबई | प्लास्टिक बंदी होऊनही बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना सर्रास पहायला मिळत आहे. आपली सामाजिक बांधिलकी जपत ‘साई’ म्हणजेच सोशल ऍक्टिव्हीटीज इंटिग्रेशन या संस्थेने नुकतेच विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

संजना गजाकोश यांनी या मुलांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व समजावून सांगत सोप्या पद्धतीने कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी साई संस्थेचे संस्थापक विनय वस्त, अरविंद पाटील, आनंदीता पेडामकर हेदेखील या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

“प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवायची असेल तर सुरुवात ही शालेय विद्यार्थ्यांपासुनच करायला हवी. कारण प्रत्येक नवी पिढी देशाचं भवितव्य ठरवते”. असे ’संजना गजाकोश’ म्हणाल्या.

“बदलत्या काळाचा वेग पकडत आपणही नवे बदल स्वीकारायला हवेत. हाच विचार आम्ही या वंचित घटकातील मुलांना देत असतो. जनजागृती करण्यासाठी ‘साई संस्था’ नेहमीच नवे उपक्रम राबवत असते. म्हणूनच यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संतुलनाविषयी सजगता आणण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. समाजप्रबोधनासाठी यापुढेही अशाच नवनवीन उपक्रमात आम्ही सक्रीय राहू”. असे साई संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिवळे मोजे घालून देशभरात अभियान, गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्डची मान्यता

News Desk

भाजप ही सिंहाची पार्टी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

एअरटेलतर्फे आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सच्या वेळेआधी डिलिव्हरीला सुरुवात 

News Desk