HW News Marathi
मुंबई

मुलीने पळून जावून प्रेमविवाह केला, तिकडे आई-वडिलांनी रेल्वेखाली जीव दिला

सातारा: मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. कराडजवळील ओगलेवाडी येथील एसटी कंडक्टरने पत्नीसोबत रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली. बबन पवार आणि कल्पना पवार असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव होते. बबन पवार यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी पदवीच्या दुसºया वर्षाला शिकत होती. या मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला. शुक्रवारी मुलीने फोन करून आई वडिलांना लग्न केल्याचे सांगितले. मुलीच्या या कृत्यामुळे समाजात बदनामी होईल, या भीतीने बबन यांनी पत्नीसोबत रेल्वेखाली उडी घेतली. बबन पवार हे कराड एसटी आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. मोठ्या मुलीशिवाय त्यांना ९ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा एक मुलगा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग; विद्यार्थ्यांनी केला स्वच्छ मुंबईचा संकल्प

Aprna

संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेचा जबाबदारी कोणाची हे निश्चित करा !

News Desk

पश्चिम रेल्वेची पावसाळ्यापुर्वी जय्यत तयारी

News Desk