HW News Marathi
मुंबई

कुलगुरूंना हटवताना राज्यपाल दबावाखाली होते का-मुणगेकर यांचा सवाल

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून हटवण्यासाठी राज्यपालांनी अडीच महिन्यांचा कालावधी का घेतला?, असा प्रश्न उपस्थित करत माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या काराभारावर टीका केली आहे. अडीच महिन्यांपूर्वीच कुलगुरू बदलाची प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती. आतापर्यंत नवे कुलगुरू मिळाले असते. राज्यपालांवर असा कोणता दबाव होता, जेणेकरून त्यांनी निर्णय घ्यायला एवढा उशीर लावला, असा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

विद्यापीठाची संपूर्ण विश्वासार्हता धुळीस मिळवली आहे. त्यातून प्रशासनाने काहीही धडा घेतलेला नाही. पुन्हा आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या परीक्षा आॅनलाईन असेसमेंट पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. परीक्षा प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे. कारण हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य खराब झाले आहे. अद्याप ३ हजार ६०० विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहे. तर २४ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाचे रिव्हँल्युशन शिल्लक आहेत, असंही यावेळी मुणगेकर यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत मुणगेकर यांनी विद्यापीठाच्या कारभारावर चौफेर टीका केली आहे.

जर मुंबई विद्यापीठाला आॅक्टोबरमधील परीक्षा आॅनलाइन असेसमेंट पद्धतीने घ्यायच्या असतील तर उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे. ४५ दिवसांत निकालाची हमी द्यावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मुंबईच्या उच्चभ्रु वस्तीत नपुंसकता वाढली

News Desk

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू

News Desk