HW News Marathi
मुंबई

पहिल्या पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली, मध्य-पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई । राज्यभरात दुष्काळ आणि उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा मिळाला आहे. मुंबईत काल (१० जून) ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत ढगाचा कडकडटासह पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पहिल्याच पावसाने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. तर मुंबई विमानतळावरही काही विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर कोपर स्थानकाजवळ गाड्या खोळंबल्या आहेत, तर पश्चिम रेल्वेवर वांद्रे आणि अंधेरीजवळ तांत्रिक बिघाडामुळे लोकल ठप्प झाली आहे. कोपर स्थानकात कर्जतच्या दिशेने जाणार्‍या गाडीवर पेंटाग्राफचे स्पार्क उडाले. त्यामुळे अप आणि डाऊन वरील गाड्या ठप्प झाल्या आहेत.

कोपरजवळ पेंटग्राफ आणि ओएचइमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे लोकल सेवा चांगलीच प्रभावित झाली होती. कोपरहून ८ वाजून ३ मिनिटानी कर्जत गाडी कोपर स्थानकतच अडकली होती. तसेच नागपूर दुरोंतो देखील दिवा स्थानकावर अडकली. मात्र कोपर स्थानकावरील स्पार्क इतका मोठा होता. की, काही वेळासाठी संपूर्ण स्थानकावारील वीज गेली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली कल्याण जलद लोकल कुर्ला स्थानकावर १५ मिनिटे उभी होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामनाथ मोतें, शेषराव बीजवार यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी

News Desk

अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी

News Desk

पाऊले चालती पंढरीची वाट

News Desk