HW News Marathi
मुंबई

28 हजार महापालिका कर्मचारी करत आहेत मुंबईची स्वच्छता

मुंबईच्या रस्त्यावरून पाच हजार मेट्रीक टन कचरा हटवला

मुंबईः मुंबई व परिसरात बुधवारी पावसाने सकाळपासून विश्रांती घेतल्याने मंगळवारपासून घराबाहेर अडकून पडलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अनेक ठिकाणी अद्याप जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. रेल्वेसेवा संथगतीने सुरू असली तरी रस्ते वाहतूक मात्र जागोजागी ठप्प झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, रस्त्यावर जमा झालेला कचरा हटवण्याचे काम बीएमसीचे कर्मचारी करत आहेत. आतापर्यंत पाच हजार मेट्रीक टन कचरा उचलण्यात आल्याची माहीत महापालिका आयुक्त अजोय महेता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी मुंबईच्या रस्त्यारस्त्याने पूरस्थिती अनुभवली. बुधवारी काही प्रमाणात पाणी ओसरले आहे. परंतु या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी प्रंचड प्रमाणत कचरा जमा झालेला दिसून आला. पाणवेली, कॅरी बॅगांचा ढिग रस्त्यावर दिसून आला. कुर्ला परिसरातील मिठी नदीलगतच्या रस्त्यावर आज कचऱ्याचा महापूर आल्याचे चित्र होते. निसर्ग कोणाचेही उपकार ठेवत नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दरम्यान, रस्त्यावरील कचरा काढण्यास महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याने वाहतूक कोंडी कायम आहे. ती दूर होत नसल्याने घरी पोहोचण्यास अनेकांना अडथळा येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi | दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

द्रविता सिंग राहिली स्वत:च्या पायावर उभी

News Desk

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna