HW News Marathi
मुंबई

जुहू चौपाटीवर बुडालेल्या पाच जणांपैकी २ तरुणांचा मृत्यू

मुंबई | जुहू समुद्र किनाऱ्यारवरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटी गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ५ तरुण बुडाल्याची घटना घडली होती. यात दोघांचा मृत्यू झाला असून वसीम खान (२२) तरुणाला वाचवण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तर २ जण बेपत्ता तरुणांचा अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस यांचा शोध घेत आहेत.

 

अंधेरी पश्चिम हा फरदिन सौदागर (१७), सोहेल शकील खान (१७), फैसल शेख (१७), नाझीर गाझी (१७), आणि वसीम सलीम खान (२२) ही जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यावेळी समुद्राला भरती असल्याने ते पाचही जण बुडाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाकिस्तान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सैराटला स्थान

News Desk

शरद पवारांविषयी केलेलं ते वक्तव्य संजय राऊतांना भोवलं,राऊत शिवसेनेत आहेत का राष्ट्रवादीमध्ये ?कॉंग्रेसचा सवाल

News Desk

स्वाभिमानीचे नेते नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी विधीमंडळात

Adil
महाराष्ट्र

विधानभवनाची बत्ती गुल, नागपुरात मुसळधार पाऊस

News Desk

नागपूर | नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात आहे. यामुळे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना पहिल्यांदाच बत्ती गुल झाल्यामुळे विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले आहे. विधीमंडळाचे पुढील कामकाज सोमवारी होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात याआधी कधीच विधीभवनाची बत्ती गुल झाली नव्हती. पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विरोधक विधीभवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा हा फक्त जुमला असल्याचे घोषणा करत होते. विरोधकांनी मोबाईलच्या फ्लॅश लाईटचा आधार घेत सरकार विरोधात घोषणा करत होते.

या पावसामुळे नागपूरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे. या मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. विधिमंडळाला वीज पुरविण्यासाठी उभारण्यात आलेल्या लाईट रुममध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला नसून तो तात्पुरता बंद करण्यात आला असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

नागपूर अधिवेशनात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर जलयुक्त नागपूर करुन दाखविले, अशा शब्दात टीका करुन सरकारवर निशाणा साधला.

 

Related posts

राज्य शासन शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार! – दीपक केसरकर

Aprna

पर्यटक आपला ब्रँड एम्बेसेडर होईल अशा सुविधा करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

News Desk

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ‘ही’ नियमावली!

News Desk